रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या पक्षांमध्येच चुरस लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यात जागा वाटपावरून संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्ह्यात भाजप पक्षाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी लागले असून शिवसेना शिंदे गटाकडूनही तयारी सुरु झाली आहे. या निवडणुकांसाठी कोणत्या पक्षाला जास्त जागा मिळणार ? आणि कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोबर या महिन्यात घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेचे काम हाती घेण्यात आले. तसेच स्थानिक पातळीवर या निवडणुका चुरशीच्या बनवण्यासाठी राजकीय पक्षांनी काम करण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे जास्त वर्चस्व असल्याने भाजपाला आपल्या अस्तित्वासाठी लढावी लागणार आहे.

महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सत्तेत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष जिल्ह्यात आपले अस्तित्व वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच या निवडणुकांसाठी होणाऱ्या जागा वाटपावरून शिवसेना-भाजप या दोन पक्षांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. भाजपा पक्षाने रत्नागिरी जिल्ह्यात खासदार नारायण राणे व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात भाजपा विरुद्ध शिवसेना अशीच लढत बघायला मिळणार, अशी शक्यता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. या निवडणुकांसाठी भाजपा व शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मतभेद होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील या होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही तयारी सुरू केल्याने भाजप निवडणुकीमध्ये ताकदीने उतरणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी रस्सीखेच होणार आहे. मात्र जास्तीत जास्त जागा कोणत्या पक्षाला मिळतात आणि या निवडणुकांमध्ये कोणाची वर्णी लागणार, याकडे आता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किती जागा मिळणार? याकडे आता शिवसेना कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. जागा वाटपाच्या वेळी शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांची दमछाक होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येवून काम करणार आहेत. जागा वाटपाचा निर्णय वरिष्ट पातळीवरील नेते घेतील. जागा वाटपावरुन वाद होण्याची शक्यता कमी आहे. मात्र भाज मोठे यश मिळविले. – नीलेश खाडे, शहराध्यक्ष, भाजप