संतोष प्रधान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून गेल्या २३ वर्षांत पक्षाला राजधानी मुंबईत कधीच विस्तार करता आलेला नाही. पक्षाने अनेक प्रयोग केले पण त्यात यश आले नाही. यातूनत बहुधा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:च लक्ष घातले आहे. गेल्या आठवडाभरात मुंबईत पक्षाच्या दोन मेळाव्यांना हजेरी लावून नेते आणि कार्यकर्त्यांना नैतिक बळ देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Thane Police, Thane Police Issue Notices to NCP office bearers , Jitendra awhad, Jitendra awhad Opposes Move, lok sabha 2024, thane lok sabha seat, thane news,
प्रतिबंधात्मक नोटीसांच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांचा ठाणे पोलिसांना इशारा
MP Sanjay Singh On Swati Maliwal
स्वाती मालीवाल यांना मारहाण झाल्याच्या आरोपावर ‘आप’चा खुलासा; संजय सिंह म्हणाले, “हो त्यांच्याशी…”
AJit Pawar vs Supriya Sule
“मी त्यांचा मुलगा नसल्याने संधी मिळाली नाही”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझी कारकीर्द…”
young woman suicide koparkhairane, navi Mumbai rape marathi news
युवतीच्या आत्महत्येस कारण असलेल्या दोन युवकांच्या विरोधात सहा महिन्यांनी गुन्हा दाखल 
abhishek banerjee challenges amit shah
“हिंमत असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा”, ममता बॅनर्जींच्या पुतण्याचे अमित शाह यांना आव्हान; म्हणाले, “जी व्यक्ती…”
Inadequate Public Relations, Misconduct to office bearers , lead to cut the ticket, Mumbai bjp members of parliament, gopal Shetty, Poonam Mahajan, manoj kotak, lok sabha 2024, north Mumbai lok sabha seat, Mumbai north central lok sabha seat, north east Mumbai lok sabha seat, marathi news, bjp Mumbai, Mumbai news,
जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले
nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
Congress Leader Kamalnath Promised Giving Article 370 Masjid Place But Real Video Is Different
“३७० लागू करू, मशिदीला जागा देऊ..”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचं मुस्लिमांना आश्वासन? Video तील वाक्य आधी नीट ऐका

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरदर पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्या सहभागी झाले होते. गेल्या आठवड्यात चेंबूरमध्ये मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले होते. मुंबईत पक्ष वाढू शकतो, असा विश्वास त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना दिला. मुंबई ही कार्यकर्त्यांची खाण आहे. मुंबई बदलत आहे. त्या दृष्टीने राष्ट्रवादीला हे बदल स्वीकारून पुढे जावे लागेल, असा संदेश त्यांनी दिला. मुंबईत पक्ष वाढीला अनुकूल वातावरण असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा >>> एकाच पक्षाचे गट-तट बारसू प्रकल्पाच्या मुद्यावर आमने-सामने

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाने राज्याच्या विविध भागांमध्ये ताकद वाढविली. सत्तेचा लाभ घेत पक्ष राज्याच्या तळागाळापर्यंत पोहचला. त्याला मुंबई आणि विदर्भ अपवाद ठरला. मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा असून, विदर्भात ६२ जागा आहेत. म्हणजेच ९८ जागांवर राष्ट्रवादी पक्ष अजूनही कमकुवत आहे. या दोन्ही विभागांमध्ये पक्षाला विधानसभा निवडणुकीत मर्यादित यश मिळते. मुंबईत पक्ष वाढीसाठी शरद पवार यांनी यापूर्वीही अनेकदा प्रयत्न केले होते. पण पक्षाची तेवढी वाढ झालेली नाही. महानगरपालिकेत राष्ट्रवादीला दुहेरी आकडा गाठता आलेला नाही.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : “कर्नाटकात सत्ता जाणार असल्याने धार्मिक दंगलींचा बागुलबुवा उभा करतायत”; ठाकरे गटाची भाजपावर टीका

२००९ मध्ये काँग्रेसच्या मदतीने लोकसभेत ईशान्य मुंबईची जागा जिंकली होती. विधानसभेतही आकडा दोन-चारच्या वर कधी गेला नाही. छगन भुजबळ, सचिन अहिर, संजय पाटील, नवाब मलिक या नेत्यांकडे मुंबईची धुरा सोपविण्यात आली होती. पण यापैकी कोणत्याच नेत्याला मुंबईत राष्ट्रवादीची ताकद वाढविता आली नाही. पक्ष मर्यादित स्वरुपातच वाढला. काही वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांनी राज्यात राष्ट्रवादीला चांगला पाठिंबा मिळत असताना मुंबई मागे राहिल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. अजित पवार यांनी मुंबईत वाढ खुंटल्याबद्दल थेट शहरातील नेत्यांनाच दोष दिला होता.

हेही वाचा >>> भंडाऱ्यात भाजप आणि राष्ट्रवादीची युती

मुंबईत झोपडपट्टीवासीय, दलित, अल्पसंख्याक, बिगर मराठी भाषकांची मते महत्त्वाची असतात. राष्ट्रवादीला मुंबईत हक्काची मतपेढी तयार करता आलेली नाही. गृहखाते वर्षानुवर्षे राष्ट्रवादीकडे असतानाही मुंबईत राष्ट्रवादीला बळ मिळाले नव्हते. सर्व समाजाचा विश्वास संपादन करण्यात राष्ट्रवादीला यश आले नाही. मुंबईतील मराठी मतदार हे शिवसेना, भाजप, काँग्रेस किंवा मनसेला मतदान करतात. मुंबईत राष्ट्रवादीला तेवढे मतदान होत नाही. अमराठी मतेही फारशी मिळत नाहीत. मुंबईतील अल्पसंख्याक समाजात राष्ट्रवादीबद्दल कधीच आपुलकीची भावना नव्हती. यामुळेच मुंबईत राष्ट्रवादी तेवढे बाळसे धरू शकले नाही, अशी खंत पक्षाच्या एका नेत्याने व्यक्त केली.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर युती करून लढणार आहे. काँग्रेस सोबत येण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. शिवसेनेच्या ताकदीचा फायदा करून घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल. महापालिका निवडणुकी कधी होतील याबाबत स्पष्टता काहीच नाही पण पक्षाचा जनाधार वाढावा म्हणून शरद पवार यांनी आतापासून लक्ष घातला आहे.