दिगंबर शिंदे

सांगली : सांगली शहरालगत असलेल्या कर्नाळमध्ये केवळ ३३ गुंठे जमीन. सिंचन सुविधा नसल्याने घरात हातातोंडाची गाठ पडण्यासाठी वडिलांची रोज एकाचा बांधाला पायपीट ठरलेली. अशा स्थितीत निदान दोन वेळच्या जेवणाची तरी भ्रांत मिटेल या आशेने सांगली जवळ केली. अशा घरातून आलेला एक युवक आज नेतृत्वाबरोबर युवकांमध्ये वाढती व्यसनाधिनता रोखण्यासाठी आणि हाताला काम देण्यासाठी झटत आहे. काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव म्हणून कार्यरत असलेले युवा नेतृत्व म्हणजे शेखर विश्वासराव माने.

Doordarshan logo, saffron logo,
दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम

घरची परिस्थिती यथातथाच असतानाही संगणक शाखेतील पदविका घेऊन सांगलीत आज बांधकाम व्यवसायामध्ये चांगला जम बसविला आहे. मात्र, आपण ज्या समाजातून आलो, त्या समाजाचे काही तरी देणं लागतो म्हणून समाजाचा विचारही प्राधान्याने करण्याचे बाळकडू शालेय वयातच मिळाले. यातून वसंतदादा घराण्याच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा घेऊन धडाडीने राजकारण, समाजकारण करणाऱ्या स्व. मदन पाटील यांच्या संपर्कात आले.

हेही वाचा: राहुल पंडित : रत्नागिरीच्या राजकारणातला सुशिक्षित, सुसंस्कृत चेहरा

यातून महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करण्याची दोन वेळा संधीही मिळाली. कामगार वर्गाला विसावा मिळावा यासाठी शहरात बांधकाम कामगारांसाठी निवारा केंद्र उभारण्यात पुढाकार तर घेतलाच, पण याचबरोबर शहराचे सौंदर्य वाढावे, नागरिकांना नैसर्गिक विरंगुळा मिळावा यासाठी काळी खण विकासासाठी आग्रहही धरला. आज या योजना मूर्त स्वरूपात येण्याच्या अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत.गेल्या दोन वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात सक्रिय आहेत. सध्या प्रदेश संघटक व सचिव या पदावर पक्षात कार्यरत असताना सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात पक्ष निरीक्षक म्हणून पक्षाने जबाबदारी सोपवली आहे.

हेही वाचा: रुपेश राऊळ : राडा संस्कृतीतील लढवय्या

भ्रष्टाचारमुक्त प्रशासन यासाठीचा त्यांचा आग्रह महापालिका सदस्य असताना वेळोवेळी दिसून आला आहे. याच बरोबर युवकांमध्ये वाढती व्यसनाधिनता रोखण्यासाठी चळवळही युवा मंचच्या माध्यमातून चालविण्यात येते. पर्यावरण संरक्षणासाठीही संघटित प्रयत्न केले जात आहेत. केवळ युवकच नाही तर महिलाही सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी महापालिकेच्या माध्यमातून गृह उद्योगाला चालना देत असतानाच उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचेही प्रयत्न केले आहेत.