महाराष्ट्राच्या वाटचालीत आपल्या सहभागातून लाखमोलाचे योगदान देणाऱ्या कर्तबगार महिलांचा लेखाजोखा ‘बदलता महाराष्ट्र’च्या नव्या पर्वात मांडण्यात येणार आहे.

‘वर्ल्ड वेब सोल्यूशन्स’ प्रस्तुत ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांच्या हस्ते गुरुवारी (२८ मार्च) करण्यात येणार आहे. ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या उषा काकडे या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहाणार आहेत. ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.  बदलत्या काळाबरोबर महिलांपुढील बदलणारी आव्हाने आणि त्यांवर मात करीत विविध क्षेत्रांमध्ये त्या गाजवत असलेल्या कार्यकर्तृत्वाचा, लढय़ाचा आणि त्यानिमित्ताने दिल्या जाणाऱ्या अग्निपरीक्षेचा आढावा, सकारात्मक बदलांचा वेध घेण्यात येणार आहे.