८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण द्यायचे राहून गेल्याने संमेलन स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांची उद्धव ठाकरेंची जाहीर माफी मागितली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर साहित्य संमेलनाला उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेनेने नाराजी व्यक्त केलीय. उद्धव ठाकरेंना संमेलनाचं निमंत्रण न दिल्याबद्दल पाटील यांनी मी मनापासून माफी मागतो असा माफीनामाच सादर केला.