लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील ३ हजार ५६३ शाळांपैकी ८० शाळा शिक्षकांविना आहेत. तसेच १ हजार २४० शिक्षकांची कमतरता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या ३४ गावांतील जिल्हा परिषद शाळांतील ५३४ शिक्षक जिल्हा परिषदेकडेच ठेवण्याची प्रस्ताव जिल्हा परिषदेने राज्य सरकारला दिला आहे.

rte registration process starting from Tuesday January 14
आरटीई प्रवेशांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून, किती जागा उपलब्ध?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
Salary of hourly professors at Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University is overdue
नागपूर विद्यापीठाच्या तिजोरीत ठणठणाट? तासिका प्राध्यापकांचे वेतन थकले
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
Why is the establishment of the Higher Education Commission delayed print exp
उच्च शिक्षण आयोगाचे काय झाले? स्थापनेस विलंब का?
loksatta readers feedback
लोकमानस: पिढ्या बरबाद करणारे धोरण

अलीकडेच पुणे महापालिकेत ३४ गावे समाविष्ट करण्यात आली. या गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. पुणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित ३ हजार ५६३ शाळा आहेत. या शाळांमध्ये सहायक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक यांची एकूण ११ हजार ७४२ मंजूर पदे आहेत. त्यापैकी १० हजार ५०२ शिक्षक उपलब्ध आहेत. जिल्हा परिषद शाळांपैकी ८० शाळांमध्ये एकही शिक्षक उपलब्ध नाही. त्यामुळे दुर्गम भागातील, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांतील शाळांच्या शिक्षकांनी महापालिकेत हस्तांरण होण्यासाठी महापालिकेमध्ये सेवा वर्ग करण्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा-जेजुरीच्या सोमवती अमावस्येच्या यात्रेत पालखी उतरत असताना चेंगराचेंगरी, पाच भाविक जखमी

या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिक्षकांची आवश्यकता असून, त्यामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांतील शाळांतील सुमारे ५३४ शिक्षकांचे हस्तांतरण न करता त्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेकडेच ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाला दिला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळाले पाहिजे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. शाळांना शिक्षक उपलब्ध होत नसल्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांतील शिक्षक जिल्हा परिषदेला मिळण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. शिक्षक उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास निश्चितच मदत होईल.

Story img Loader