माजी खासदार, भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जात टीका केली होती. यावरून निलेश राणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लक्ष्य करण्यात येत आहे. महाराष्ट्रात निलेश राणे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून आंदोलनही करण्यात येत आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत राज्यातील राजकीय पक्षांना सल्ला दिला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

निलेश राणे नेमकं काय म्हणाले?

“मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माबाबत चिंता वाटावी अशी स्थिती,” असं विधान शरद पवार यांनी केलं होतं. यावर निलेश राणे यांनी शरद पवार यांची तुलना औरंगाजेबरोबर केली होती.

Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
Sharad pawar and Ajit Pawar
Supriya Sule : शरद पवार – अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, “माझ्या कुटुंबाबाबत…”
शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना का वाटतंय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना का वाटतंय?
Sharad Pawar Ajit Pawar
BJP : शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याबद्दल बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाची ना…”

हेही वाचा : “सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा…”, संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

“इतके गलिच्छ पद्धतीने बोलण्याचं काम…”

याबद्दल अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर ते म्हणाले, “यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणून मुख्यमंत्रीपद सांभाळलं. तेव्हापासून अनेक दिग्गजांनी मुख्यमंत्रीपद सांभाळल्याचं आपण पाहिलं आहे. पण, इतके गलिच्छ पद्धतीने बोलण्याचं काम काही राजकीय पक्षाचे लोक करत आहेत. त्यांना बोलता येत इतरांना बोलता येत नाही का?,” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

हेही वाचा : “सौरभ पिंपळकरचा मास्टरमाईंड…”, शरद पवारांना आलेल्या धमकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

“…तर महाराष्ट्राला बदनाम करण्याची गोष्ट आहे”

“राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील नेते, प्रवक्ते आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याची गरज नाही. असेच होत राहिलं, तर महाराष्ट्राला बदनाम करण्याची गोष्ट आहे,” अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader