पिंपरी-चिंचवड शहरातील बेकायदा बांधकामे, शास्तीकर, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य अशा अनेक विषयांत भाजपकडून शहरवासीयांचा अपेभाभंग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच काळात मंजूर तथा सुरू झालेली कामे शहरात दिसून येत असून केवळ उद्घाटनांची औपचारिकता भाजपकडून सुरू आहे. राष्ट्रवादीने पालिका लुटल्याचा आरोप भाजपने सातत्याने केला. त्याच पद्धतीने भाजपकडून दरोडेखोरी सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेब्रुवारी २०१७ मध्ये पालिका निवडणुका झाल्या, त्यास वर्ष पूर्ण झाले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील पिंपरी पालिका भाजपने ताब्यात घेतली. मात्र, सत्ता राबवण्याचे तंत्र सांभाळता न आल्याने वर्षभरातच रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती पिंपरीत निर्माण झाली आहे. सत्ता कशी राबवू नये, याचे उत्तम उदाहरण म्हणून पालिकेच्या सध्याच्या कारभाराकडे पाहता येईल. कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे, याचा गोंधळ उडाल्याने आणि टक्केवारीतच स्वारस्य दाखवल्याने चांगले किंवा भरीव असे काही होताना दिसत नाही. बेकायदा बांधकामे नियमित करू, शास्तीकर रद्द करू, असे आश्वासन भाजपने दिले. मात्र, तशी कृती झाली नाही. २४ तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात दररोजचा पाणीपुरवठा विस्कळीत आहे. भाजपची छाप असेल, असा कोणताही प्रकल्प  सुरू होऊ शकलेला नाही. जुनीच कामे सुरू आहेत. स्वच्छ  शहराचा लौकिक असताना घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp fail to solve basic problems of pimpri chinchwad city
First published on: 20-02-2018 at 05:11 IST