पुणे : कर्ज, नोकरी, लॉटरी अशा प्रकारची आमिषे दाखवून होणारी सायबर फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने ‘चक्षू’ ही प्रणाली विकसित केली आहे. फसवणुकीसंदर्भातील तक्रारी ‘संचारसाथी’ या संकेतस्थळावर नोंदवता येणार असून, माहितीच्या सुरक्षित देवाणघेवाणीसाठी डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मही (डीआयपी) विकसित करण्यात आला आहे.

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यमंत्री देवुसिंह चौहान, विभागाचे सचिव डॉ. नीरज मित्तल या वेळी उपस्थित होते. विविध प्रकारच्या सायबर गुन्हे प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर असे प्रकार रोखण्यासाठीची प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
कृषी क्षेत्राबाबत मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
sachet app engineers oppose marathi news
मुंबई: विभाग स्तरावरील कामांवर देखरेख ठेवण्यासाठी घेतलेल्या मोबाईल ॲपला अभियंत्यांचा विरोध, ॲप न वापरण्याचे संघटनेचे आवाहन
airtel ai based network solution on spam
एअरटेलने सादर केली भारतातील पहिली AI आधारित नेटवर्कची स्पॅम शोध प्रणाली: ग्राहकांना मिळणार रीअल-टाइम अ‍ॅलर्ट्स!
Loksatta anvyarth Bombay High Court decision regarding changes in the Information Technology Regulations of the Central Government
अन्वयार्थ: सत्यप्रियता म्हणजे सत्ताप्रियता नव्हे!
dharavi re devlopment ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
धारावीत लवकरच पाच नमुना सदनिका; पात्र रहिवाशांसह अपात्र, पात्र लाभार्थींना घरांविषयी माहिती
pm narendra modi sets usd 500 billion target for electronics sector by 2030
इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी ५०० अब्ज डॉलरच्या टप्प्याचे लक्ष्य; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून २०३० पर्यंतचे उद्दिष्ट 
Increase in epidemic diseases in Maharashtra state Mumbai news
राज्यात साथरोग आजारात वाढ! राज्य संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण उच्चस्तरीय समितीची बैठक…

हेही वाचा >>>पिंपरी : पाणीपट्टी थकबाकीदारांच्या तोंडचे पाणी पळणार; महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सुरक्षित भारत उपक्रमांतर्गत सायबर फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यात राष्ट्रीय, संस्था आणि वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. सायबर फसवणुकीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठीची जागृती नागरिकांमध्ये करण्यात येत आहे. चक्षू आणि डीआयपी या प्रणालींमुळे सायबर फसवणुकीच्या घटना रोखण्याच्या, सायबर सुरक्षेतील धोके तपासण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होणार आहे, असे वैष्णव यांनी सांगितले. सुरक्षित पद्धतीने माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (डीआयपी) या प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. चक्षू ही प्रणाली, त्याचा वापर या संदर्भातील अधिक माहिती https://sancharsaathi.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.