पुणे : कर्ज, नोकरी, लॉटरी अशा प्रकारची आमिषे दाखवून होणारी सायबर फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने ‘चक्षू’ ही प्रणाली विकसित केली आहे. फसवणुकीसंदर्भातील तक्रारी ‘संचारसाथी’ या संकेतस्थळावर नोंदवता येणार असून, माहितीच्या सुरक्षित देवाणघेवाणीसाठी डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मही (डीआयपी) विकसित करण्यात आला आहे.

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यमंत्री देवुसिंह चौहान, विभागाचे सचिव डॉ. नीरज मित्तल या वेळी उपस्थित होते. विविध प्रकारच्या सायबर गुन्हे प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर असे प्रकार रोखण्यासाठीची प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

sarkari naukri nhpc recruitment 2024
NHPC Recruitment 2024 :कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू; ३० एप्रिलपूर्वी करा अर्ज
Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Disney pushing users towards paying for their own account and Stop password sharing From June
नेटफ्लिक्स नंतर Disney चा मोठा निर्णय, ‘ही’ सुविधा करणार बंद; कधी होणार अंमलबजावणी?

हेही वाचा >>>पिंपरी : पाणीपट्टी थकबाकीदारांच्या तोंडचे पाणी पळणार; महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सुरक्षित भारत उपक्रमांतर्गत सायबर फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यात राष्ट्रीय, संस्था आणि वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. सायबर फसवणुकीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठीची जागृती नागरिकांमध्ये करण्यात येत आहे. चक्षू आणि डीआयपी या प्रणालींमुळे सायबर फसवणुकीच्या घटना रोखण्याच्या, सायबर सुरक्षेतील धोके तपासण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होणार आहे, असे वैष्णव यांनी सांगितले. सुरक्षित पद्धतीने माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (डीआयपी) या प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. चक्षू ही प्रणाली, त्याचा वापर या संदर्भातील अधिक माहिती https://sancharsaathi.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.