पुणे :  राज्यातील सेमी इंग्रजी शाळांसाठी मराठी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा देण्याच्या या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यामध्ये शासनाची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने शासन धोरणानुसार आणि तरतुदीनुसार शिक्षक भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा >>> कात्रज प्राणिसंग्रहालयात चौशिंग्या, तरस आणि बिबट्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूण २१ हजार ६७८ पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे. सर्वाधिक पदे  जिल्हा परिषद शाळांतील असून, खासगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद शाळांचा समावेश आहे. या पदांसाठी पवित्र संकेतस्थळावर ५ फेब्रुवारीपासून प्राधान्यक्रम निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १३ फेब्रुवारी सायंकाळपर्यंत १ लाख ४१ हजार ८०६ उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंदवले असून, त्यातील १ लाख ३७ हजार ६३ उमेदवारांनी प्राधान्यक्रम अंतिम केले आहेत. प्राधान्यक्रम लाॅक करण्यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.