जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३५ वा पालखी सोहळा आज देहू येथे पार पडत असून, अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित पालखीने प्रस्थान ठेवले आहे. प्रदक्षिणा घालून पादुका मुख्य मंदिरात ठेवल्या जाणार आहेत. त्यानंतर ३० जून रोजी हेलिकॉप्टर किंवा बसमधून पंढरपूरला रवाना होणार असल्याचं देवस्थानाकडून सांगण्यात आले आहे.

या प्रसंगी दरवर्षी देहू नगरी ज्ञानोबा-तुकारामच्या गजराने दुमदुमून गेलेली असते. मात्र, यावर्षी करोनाचं संकट असल्याने अगदी मोजक्याच प्रतिनिधींच्या उपस्थित पालखी प्रस्थान सोहळा पार पडला आहे. मुख्य मंदिराच्या इथून पालखीने दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्रस्थान ठेवले. तर, देहू नगरीत महाराष्ट्रासह इतर ठिकाणाहून वारकऱ्यांनी येऊ नये असे आवाहन विश्वास्थांकडून करण्यात आले होते. त्याला वारकरी संप्रदायाकडून प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

Bhoomipujan, Mahaprasad Gruh,
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ६५ कोटी खर्चाच्या नव्या महाप्रसादगृहाचे भूमिपूजन; एक लाख भाविकांना महाप्रसादाचा लाभ
devendra fadnavis
“काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी चढली आहे, त्यांच्या…”; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांवर टीकास्र!
Shivaji maharaj, wagh nakh, satara,
शिवशस्त्रशौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन – जितेंद्र डुडी
Supriya Sule, Tukaram Maharaj,
सुप्रिया सुळेंनी पतीसह तुकाराम महाराजांच्या पादुकांचे घेतले दर्शन, राज्य सरकारवर केली सडकून टीका
Alandi, Dnyaneshwar Mauli,
आळंदी: संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती, टाळ- मृदंगाच्या गजरात वारकरी तल्लीन
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान, विठू नामाच्या गजरात आळंदी दुमदुमली, मुख्यमंत्रीही झाले पालखीत सहभागी
Rasta Roko movement of Shivpremi in Kolhapur
कोल्हापुरात शिवप्रेमींचे रास्ता रोको आंदोलन
Provision of 13 crore 40 lakhs for Chhatrapati Sambhaji Maharaj memorial site in Shirala
छत्रपती संभाजी महाराजांच्या शिराळ्यातील स्मृतीस्थळासाठी १३ कोटी ४० लाखाची तरतूद

दरम्यान, संपूर्ण देहू नगरीत आज शांतमय वातावरण पाहायला मिळाले.  पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी मुख्य मंदिरात विसावणार असून ३० जून रोजी  हेलिकॉप्टर किंवा बसने पंढरपूरला रवाना होणार आहे. आज मुख्य मंदिर परिसर हा  ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजराने दुमदुमून गेला होता. मंदिराच्या आत उपस्थित वारकऱ्यांकडून सोशल डिस्टसिंगचं तंतोतंत पालन करण्यात आलं. मंदिराच्या पटांगणात आखलेल्या गोल वर्तुळांमध्ये शिस्तीत उभे राहून सर्व वारकरी, टाळकरी हरीनामाचा जयघोष करत होते.