पुणे : सुनेपासून सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे सांगून सहा लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तोतया वकील महिलेला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा. लोणीकाळभोर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कडू बाबुराव सातपुते (वय ६३, रा. दाहिगाव, माळी गल्ली, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

सातपुते यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन स्नेहल कांबळे हिने त्यांना वकील असल्याचे खाेटे सांगितले. ‘तुमच्या विरुद्ध बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलेल्या सुनेपासून साेडचिठ्ठी घेऊन देते,’ असे आमिष दाखवून तिने सातपुते यांच्याकडून वेळाेवेळी रोखीने तसेच बँक खात्यावर मिळून पाच लाख ९४ हजार रुपये घेतले. मात्र, साेडचिठ्ठी मिळवून न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी लाेणीकाळभाेर पाेलिसांनी सापळा रचून महिलेस खंडणीचे पैसे स्वीकारताना अटक केली, अशी माहिती पाेलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली. आरोपी स्नेहल कांबळे विराेधात लाेणीकाळभाेर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात वरिष्ठ पाेलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे म्हणाले, ‘स्नेहल कांबळे हिने सातपुते यांना तुमच्या सुनेने बलात्कार तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून, महिला आयाेगाकडे सासरच्या व्यक्तींविराेधात तक्रार दिली आहे, असे खोटे सांगितले. त्यातून सुटका करून घेण्यासाठी पाेलीस आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांना पैसे दिले नाही तर तुम्हाला अटक हाेईल, अशी भिती सातपुते यांना घातली. त्यांच्याकडून वेळोवेळी खंडणी स्वरूपात पाच लाख ९४ हजार रुपये खंडणी घेतली.’

सातपुते यांनी पुणे पाेलीस आयुक्त अमितेश कुमार आणि परिमंडळ पाचचे पाेलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांची भेट घेऊन त्यांना हकीगत सांगितली. त्यानुसार लाेणीकाळभाेर पाेलिसांनी एक स्वतंत्र पथक तयार करून स्नेहल कांबळे हिला तक्रारदार यांच्याकडून १५ हजार रुपये खंडणीची रक्कम घेताना सापळा रचून अटक केली. ही रक्कम स्वीकारताना तसेच पैसे माेजून आणखी पैशाची मागणी करतानाचे व्हिडिओ चित्रीकरण करून पाेलिसांनी पुरावे गाेळा केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वकील असल्याचे सांगून स्नेहल कांबळे हिने अनेक नागरिकांची फसवणूक केली असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली आहे. अशा प्रकारे फसवणूक झाली असेल त्यांनी लाेणीकाळभाेर पाेलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.