“मागील वर्षी करोनाचे संकट असताना देखील विकास कामांना गती देण्याचे काम केले आहे. आता करोना कमी झालाय पण गेलेला नाही. इथं तर पठ्ठ्यानी मास्कच काढून टाकलेला आहे. आहो चायनामध्ये काल परवा लॉक डाऊन करण्याची वेळ आली आहे. करोनाला एवढ लाईटली घेऊ नका, बाबांनो. आमच्यातील एका मंत्र्यांला दोन महिन्यामध्ये तीनदा करोना झाला होता,” असं मंत्र्याचं नाव न घेता अजित पवार म्हणाले.

तसेच “तुम्ही मला दोन वर्षात एकदा तरी विनामास्क पाहिले का? फक्त जेवताना आणि पाणी पिताना मास्क काढतो आणि झोपताना तेवढा मास्क काढतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार कात्रज येथील कार्यक्रमात भाषण करताना म्हणताच उपस्थितमध्ये एकच हशा पिकला. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, या भावनेतून मास्क काढत नसल्याचं अजित पवार म्हणाले.

“अर्थसंकल्प सांगत असताना अनेक जण म्हणाले की, दादा मास्क काढा, तर मी म्हणालो की, माझा आवाज खणखणीत आहे. गमतीचा भाग जाऊ द्या, सर्वांनी मास्क वापरला पाहिजे, आपण सर्वांनी करोना काळात मास्क न घालण्याची आणि काळजी न घेण्याची खूप मोठी किंमत मोजली आहे. अनेक जीवा-भावाची माणसं सोडून गेलीत, त्यामुळे काळजी घ्या”, असं अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी आपल्या समोर खुप दिवसांनी विविध कामाच्या निमित्ताने आलो आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडता येईल, हा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील वाहतुकीचा प्रश्न मिटवण्यासाठी सर्व भागात मेट्रोचं जाळं पसरले पाहिजे, यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. मात्र, यासाठी केंद्राची देखील मदत आवश्यक असून याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे,” असं त्यांनी सागितलं.