पुणे विभागात झालेल्या पावसामुळे फळभाज्यांच्या प्रतवारीवर पावसाचा परिणाम झाला आहे. मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजारात आवक वाढल्यने फ्लॅावर, ढोबळी मिरचीच्या दरात दहा टक्क्यांनी घट झाली. शेवग्याची आवक घटल्याने दरात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : विसर्जनाच्या दिवशी मारामारीच्या घटना ; पोलिसांकडून चार गुन्हे दाखल

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (११ सप्टेंबर) राज्य; तसेच परराज्यांतून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ५ ते ६ ट्रक हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून १ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, गुजरातमधून ३ टेम्पो कोबी, इंदूरहून ७ ते ८ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक लसूण, गुजरातमधून २ टेम्पो भुईमुग शेंग, आग्रा, इंदूरमधून एकूण ४० ते ४२ ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा ५० ट्रक अशी आवक बाजारात झाली.

हेही वाचा >>> पुणे : लोहगाव विमानतळावर तस्करीची ६१ लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त

पालेभाज्यांचे दर स्थिर
पालेभाज्यांची आवक स्थिर आहे. मागणी कमी झाल्याने मेथीचे दर स्थिर आहेत. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीमागे पाच रुपयांनी वाढ झाली. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीच्या सव्वालाख जुडी; तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या जुडीचे दर ६ ते २० रुपये दरम्यान आहेत.

कलिंगड, खरबूज, पपई, डाळिंब महाग
पुणे विभागात झालेल्या पावसामुळे कलिंगड, खरबूज, पपई, डाळिंबाची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. लिंबाच्या गोणीमागे १०० ते २०० रुपयांनी वाढ झाली आहे. सीताफळ, अननस, संत्री, मोसंबी, चिकू या फळांचे दर स्थिर आहेत. फळबाजारात लिंबू बाराशे ते चौदाशे गोणी, डाळिंब ३५ टन, पपई २० ते २५ टेम्पो, कलिंगड १० ते १२ टेम्पो, खरबूज ३ ते ४ टेम्पो, सफरचंद ३ ते ४ हजार पेटी, सीताफळ २० टन, संत्री १५ टन, मोसंबी ५५ ते ६० टन अशी आवक फळबाजारात झाली.

हेही वाचा >>> पुणे : दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीच्या विरोधात मोक्का कारवाई

गणेशोत्सवानंतर फुलांच्या मागणीत घट
गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर फुलांच्या मागणीत घट झाली आहे. पावसामुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला असून बाजारात आवक झालेली ६० ते ७० टक्के फुले भिजलेली आहेत. सुक्या फुलांना चांगले दर मिळत असल्याची माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

मटण, मासळीला मागणी
गणेशोत्सवानंतर मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. मटण, चिकनचे दर स्थिर आहेत. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी मासळीची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत मासळीची आवक वाढली, असे मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Effect of rainfall on quality of fruits and vegetables pune print news amy
First published on: 11-09-2022 at 17:39 IST