पिंपरी- चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैष्णवीच्या आई- वडिलांची भेट घेऊन सांत्वन केले. घटनेची माहिती घेतली. समाजाने सूनेबद्दल मानसिकता बदलण्याची गरज असून लाडक्या बहिणीप्रमाणे लाडकी सून अशी मानसिकता केली पाहिजे. अस मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, झालेली घटना ही दुर्दैवी आहे. माणुसकीला काळिमा फासणारी आहे. वैष्णवीचा अमानुष छळ करण्यात आला आहे. मारहाण करण्यात आली. सून ही मुली प्रमाणे असते. मुली प्रमाणे नानंदवली पाहिजे. लाडकी बहिणी प्रमाणे लाडकी सून अशी मानसिकता समाजाने तयार करायला हवी. आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे. पुढारलेला आहे. अशा महाराष्ट्रात दुर्दैवी घटना घटना खेदजनक आहे. नऊ महिन्याचे बाळ असताना आमची मुलगी आत्महत्या करू शकत नाही. अस कस्पटे कुटुंबाच म्हणणं आहे. पोलीस तपास करत आहेत. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. वैष्णवीच्या प्रकरणात कुणीही राजकारण करू नये. राजकारण आणू नये. आता लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. घटनेची पुनरावृत्ती होऊ नये. वैष्णवी च्या घटनेकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः लक्ष देत आहेत. जालिंदर सुपे यांचा या प्रकरणात काही सहभाग असेल तर चौकशी होईल. दोषी आढळल्यास पोलीस कारवाई करतील. कुणाला ही पाठीशी घातलं जाणार नाही.