पुणे : शहर आणि परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी आणि नाल्यांना पूरदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीला आलेल्या पुरामुळे नाल्यातील पाण्याला फुगवटा येण्याची शक्यता आहे. त्यातच पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने यंत्रणा सतर्क झाल्या असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे. विशेषत: नदी आणि नाल्यालगत राहणाऱ्या नागरिकांनी सावधनता बाळगावी, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, अशी सूचना महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून पुढील तीन दिवसात शहर आणि परिसरात अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नदी आणि नाल्यांच्या पूररेषेत असलेली घरे, झोपड्या नागरिकांनी काढून टाकाव्यात. नदीच्या, नाल्यांच्या पात्रातील पाण्याजवळ जाऊ नये. लहान मुलांबाबत दक्षता घ्यावी. डोंगरातील किंवा खाणीतील कड्यानजीक असलेली घरे, झोपड्यांवर दरड कोसळण्याची भीती असते. त्यामुळे सावध रहावे आणि कोणत्याही परिस्थितीत बांधकाम करू नये, असे आवाहन महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

पूरपरिस्थितीच्या काळात नागरिकांनी पूरनियंत्रण कक्षास किंवा नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे किंवा अग्निशमन दलाशी संपर्क साधवा. नागरिकांनी रस्त्यावर पावसाचे पाणी आसठल्यास सावधणे पायी जावे, वाहने सावकाश चालवावी, पाण्याच्या प्रवाहामुळे किंवा अपघाताने चेंबरची झाकणे उघडी पडण्याची भीती असल्याने पाण्याखालील पावसाळी गटारांचा किंवा चेंबरचा अंदाज घ्यावा, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आली आहे.

पाण्याचा निचरा करण्याची जबादारी सोसायट्यांचीच

अतिवृष्टीमुळे शहरातील गृहसंकुले, सोसायट्यांच्या आवारात पाणी शिरते. पावसाचा जोर वाढल्यानंतर पाणी शिरण्याच्या प्रमाणातही वाढ होते. त्यामुळे सोसयट्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाल्यास मोटार किंवा पंपाची व्यवस्था सोसयाट्यांनी करावी. पाण्याचा निचरा करण्याची जबाबदारी सोसायट्यांची आहे. त्यामुळे त्यांच्या स्तरावरच योग्य ती व्यवस्था करावी, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

मदतीसाठी दूरध्वनी क्रमांक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोवीस तास कार्यान्वित पूरनियंत्रण कक्ष- ०२०-२५५०६८००/१/२/३/४

पूरनियंत्रण कक्ष- ०२०-२५५०१२६९

अग्निशमन दल- १०१

सुरक्षा रक्षक कक्ष- ०२०-२५५०११३३/३०