वर्षभरापूर्वी एक मुलगा आणि मुलीचा आजारपणामुळे निधन झाले होते. या नैराश्यातून पुण्यातील नांदेड फाटा येथील संजीव कदम या पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीव कदम हे मागील काही वर्षापासून नांदेड फाटा येथे राहण्यास होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होते. ते दोघे खूप आजारी होते. त्या दोघांचा वर्षभरापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संजीव आणि त्यांची पत्नी कायम चिंतेत असायचे. संजीव यांनी पत्नीला मागील आठवड्यात गावी सोडून आले. त्यानंतर पत्नीने संजीव यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता. कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. त्यावर त्यांच्या पत्नीने घरी जाऊन पाहण्यास सांगितले. तेव्हा दरवाजा बंद असल्याचे दिसले. 

त्यानंतर कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता. संजीव यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर संजीव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.