देशातील दृष्टिहीन बांधवांना सहजपणे वाचता आली पाहिजे या उद्देशातून भारताची राज्यघटना आता ‘ब्रेल लिपी’मध्ये करण्यात आली आहे. डोळे असलेल्या व्यक्ती  कोणत्याहीही मजकुराचे वाचन करू शकतात. मात्र, प्रजासत्ताकाच्या ६८ वर्षांनंतर भारताची राज्यघटना दृष्टिहीन व्यक्तींना वाचता यावी यासाठीचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरातील एक चांगली राज्यघटना असा भारताच्या राज्यघटनेचा लौकिक आहे. भारताच्या राज्यघटनेचा अभ्यास आणि संशोधन करून त्याचे वेगवेगळे पैलू उलगडणे हा अनेकांच्या ध्यासाचा विषय आहे. मात्र, दृष्टिहीन बांधवांना राज्यघटना वाचता येत नव्हती. ही अडचण राज्यघटना आता ब्रेल लिपीमध्ये गेल्यामुळे दूर झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias constitution is now braille script
First published on: 18-11-2018 at 01:56 IST