पुणे : मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये शाहू, फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार आणि प्रतिमा दिसत नाही. त्यामुळे जरांगे हे मनूवादी वृत्तीचे असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, असा आरोप माजी आमदार लक्ष्मण माने यांनी बुधवारी केला. मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ते देण्याच्या मागणीला विरोध आहे. ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिल्यास मागासवर्गीय जातींवर अन्याय होईल. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण न देता वेगळे आरक्षण द्यावे, असेही माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले की, ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला सर्वस्तरातून विरोध होत असतानाही जरांगे ओबीसीतून आरक्षण मिळावे, ही मागणी करीत आहे. त्यासाठी ते दबावतंत्र वापरत आहे. मात्र, देशाचा कारभार हा संविधानानुसार चालतो, त्यामुळे संविधान असेपर्यंत त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे वर्चस्व आहे. आतापर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले आहेत. सर्वाधिक आमदार, खासदार मराठा समाजाचे आहे. सहकारी संस्था त्यांच्या हातामध्ये असून, सर्वच क्षेत्रांत त्यांचे वर्चस्व असतानाही त्यांना आरक्षणाची गरज का पडत आहे, याचा विचार मराठा समाजाने करावा, असे माने यांनी सांगितले.

rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
cpm polit bureau
सीताराम येचुरींच्या निधनानंतर महासचिवपदी कोणाची निवड होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत!
ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”
kedar Dighe on Anand Dighe
Anand Dighe Death Case : “आनंद दिघेंचा घात झालाय”, शिरसाटांच्या विधानावर केदार दिघेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी तयारी आहे की…”
Prakash Ambedkar criticism of Jarange Patil over the election
जरांगेंनी निवडणूक लढवली नाही, तर ते पवारांच्या इशाऱ्यावरील हे स्पष्ट; ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र
‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?
Hasan Mushrif
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांची समरजिसिंह घाटगेंवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले, “अशा लोकांच्या…”

हेही वाचा >>>पुण्यात पाच हजारपेक्षा जास्त शंभरीपार मतदार

अजित पवारांवर टीका

शरद पवार यांचे वय झाले असल्याने त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे, असे अजित पवार म्हणत आहेत. मात्र, शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार अजित पवार यांना नाही. शरद पवारांमुळे अजित पवार आहेत, याची जाणीव त्यांनी ठेवावी. सकाळी लवकर उठून काम करतो, असा दावा अजित पवार नेहमी करतात. मात्र, त्यांना सकाळी सहा वाजता शेतकरी भेटायला येत नाही तर सरकारी अधिकारी आणि कंत्राटदार भेटतात. ते श्रीमंत उमेदवारांना तिकीट देतात. अजित पवार श्रीमंताचे नेते आहेत, असा आरोप त्यांनी केला.