पुणे : करोना सावटानंतर यंदा मोठय़ा प्रमाणावर राखी पौर्णिमा साजरी होणार असली तरी नेमक्या किती राख्या लागतील याचा अंदाज व्यावसायिकांना न आल्याने राख्यांची कमतरता जाणवत आहे. राख्यांना गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मागणी वाढली आहे. राखी निर्मिती व्यावसायिकांकडून अपुरा पुरवठा झाल्याने किरकोळ बाजारातील विक्रेत्यांना मुंबई, कोलकाता, सूरत, अहमदाबाद येथील राखी निर्मिती व्यावसायिकांकडून राखी खरेदी करावी लागली.  किरकोळ बाजारात विविध प्रकारच्या एका राखीची किंमत दहा ते दीडशे रुपयांपर्यंत असून दोन वर्षांच्या तुलनेत यंदा राख्यांना मागणी वाढली असल्याचे राखी विक्रेत्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेली दोन वर्ष राखी पौर्णिमेच्या सणावर करोनाचे सावट होते. निर्बंध शिथिल झाल्यानंतर यंदा राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी खरेदीची लगबग सुरू झाली असून  येत्या गुरुवारी (११ ऑगस्ट) राखी पौर्णिमा आहे. राखी निर्मिती कोलकाता, अहमदाबाद, सूरत तसेच मुंबईत मोठय़ा प्रमाणावर केली जाते. या भागातील कारागीर वेगवेगळय़ा प्रकारच्या राख्या तयार करतात. गेल्या काही वर्षांपासून फॅन्सी प्रकारातील राख्यांना मागणी वाढली असून आकर्षक रंगसंगतीच्या एका राखीची किंमत दहा ते दोनशे रुपयांपर्यंत आहे. यंदा मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Less stock of rakhi s in the market zws
First published on: 09-08-2022 at 05:08 IST