शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख यांचा आरोप

ऑल इंडिया मज्जलिस-ई-इत्तेहादिल मुस्लिमीन (एआयएमआयएम) च्या उमेदवारांना महापालिका निवडणुकीत तिकीट देताना पाच ते दहा लाख रुपयांची मागणी औरंगाबादचे आमदार इम्तीयाज जलील यांनी केल्याचा आरोप पक्षाचे शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख यांनी बुधवारी केला.

maharashtra minister bhujbal says he is withdrawing from race for nashik lok sabha ticket
‘अमित शहा यांनी निश्चित करूनही उमेदवारी का रखडली?’ नाशिकमधून माघारीची छगन भुजबळ यांची घोषणा
wardha lok sabha seat, MP ramdas tadas , MP ramdas tadas s Son Pankaj Tadas, Pankaj Tadas defend his side, over Estranged Wife Pooja s Dispute, sushma andhare, pooja tadas, bjp, maha vikas aghadi, wardh politics, politics news
“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”

महापालिकेची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत एमआयएमला येरवडय़ातून एका जागेवर विजय मिळविता आला. या पाश्र्वभूमीवर शहराध्यक्ष शेख यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. निवडणुकीत पक्षाची तिकिटे मनमानी पद्धतीने वाटप झाल्याचेही त्यांनी सांगितले.

‘तिकिटांचे वाटप करताना औरंगाबादचे आमदार इम्तीयाज जलील यांनी मनमानी पद्धत अवलंबली होती. शहराध्यक्ष आणि कार्यकारिणीला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेण्यात आले. काही ठिकाणी उमेदवारीसाठी पैशांची मागणी करण्यात आली. त्यामुळेच पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. निवडणूक लढविणाऱ्या काही उमेदवारांकडून पाच ते दहा लाखांची मागणी करण्यात आली. मला पाडण्यासाठी आमदारांनी काँग्रेस पक्षाकडून सुपारी घेतली होती. निवडणुकीवेळी पक्षाचे पाच ते सहा नगरसेवक आमदार जलील यांच्यासोबत औरंगाबाद येथून पुण्यात आले. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील उमेदवारांकडून पैसे गोळा केले. पक्षाच्या सर्व पराभवाची जबाबदारी ही आमदार इत्मीयाज जलील यांचीच आहे. निवडणुकीपूर्वी आठ महिने आधीपासून आम्ही जलील यांना निमंत्रित करीत होतो. गेल्या तीन महिन्यांपासून तर ते दूरध्वनीही घेत नव्हते. निवडणुकीला फक्त पाच दिवस राहिले असताना त्यांनी पुण्यात येऊन येथील वातावरण खराब केले. शहरात जेवढय़ा सभा, मेळावे झाले त्याचा संपूर्ण खर्च आम्हीच केला,’ असा आरोप शेख यांनी केला. यासंदर्भात पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.