पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित भारत संकल्प यात्रा कसबा विधानसभा मतदारसंघाभोवती केंद्रित केल्याचे स्पष्ट होत आहे. कसबा विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवामुळे कसब्यातील बहुतांश ठिकाणी ही यात्रा आयोजित केली जाणार आहे.

लोकसभेची आगामी निवडणूक मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारचा खटाटोप सुरू झाला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने महापालिकेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही कसबा विधानसभा मतदारसंघात केंद्राच्या योजनांची जनजागृती केली जाणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी कार्यक्रम होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद पद्धतीने उपस्थितांबरोबर संवाद साधणार आहेत.

Bhoomipujan municipal development works Mumbai,
मुंबई : आचारसंहितेपूर्वी महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी कार्यक्रमांचा धडाका
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
ajit pawar silence on udgir
उदगीर जिल्हा निर्मितीसाठी मंत्र्याच्या मागणीनंतरही अजित पवारांचे मौन
Mahayuti Social Outreach through various programs in Nashik print politics news
नाशिकमध्ये महायुतीचे विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक अभिसरण
The ruling Shinde Pawar group and the Thackeray group also demand that the polls be held in a single phase
एकाच टप्प्यात मतदान घ्या! सत्ताधारी शिंदे, पवार गटासह ठाकरे गटाचीही मागणी; भाजप, काँग्रेसचे मात्र मौन
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
हरियाणा विधानसभा निवडणूक : चार वर्षांपूर्वी धुमधडाक्यात सुरु केलेली ‘ती’ योजना भाजपासाठी अडचणीची ठरणार?
Dharavi mosque illegal portion demolished
धारावी मशिद तोडक कारवाई: मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप, सपा आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navi Mumbai, Uran, Panvel constructions
प्रकल्पस्तांच्या मतांसाठी महायुतीची अखेरची धडपड, गरजेपोटी बांधकामे नियमित करण्याचा अखेर निर्णय

हेही वाचा – पुण्यात मनसैनिक इंग्रजी पाट्यांविरोधात आक्रमक, अनेक दुकानांवर दगडफेक

हेही वाचा – कात्रजचे दूध आजपासून दोन रुपयांनी स्वस्त

शहरातील १२५ ठिकाणी फिरत्या वाहनाच्या माध्यमातून नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करणे, जनजागृती करणे, योजनांचा लाभ मिळवून देणे अशी कामे करण्यात येणार आहेत. महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी फिरते वाहन तीन तास थांबणार असून, त्याचे नियोजन क्षेत्रीय कार्यालयाकडे देण्यात आले आहे. मात्र पहिल्या टप्प्यात कसबा विधानसभा मतदारसंघाला प्राधान्य देण्यात आले आहे.