पुणे : पुण्यातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केटमधील लाकूड साहित्याच्या सात-आठ गोडाऊनला पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीच्या घटनेला जवळपास पाच तास उलटून गेले तरी देखील अजून ही आग पुर्णपणे विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलेले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्याचं काम सुरू असून या आगीची झळ गोडाऊनच्या बाजूला असलेल्या चार घरांना बसली आहे. कुरिअर ऑफिसमध्ये काम करणार्या संतोष रामचंद्र गायकवाड यांचं घर आगीच्या घटनेत पूर्णपणे जळून खाक झाले असून त्यांच्या घराच्या केवळ भिंतीच उरल्या आहेत. "आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास मित्रानी घराचा दरवाजा वाजविला आणि सांगितले.आपल्या शेजारील गोडाऊनला आग लागली.त्यावर मी आणि पत्नी घराबाहेर पडलो.त्यावेळी घरातील सिलेंडर मोकळ्या जागेत आणून ठेवला.त्यानंतर काही मिनिटात माझं घर आगीने चारही बाजूने वेढले. या आगीच्या घटनेमध्ये पैसे,महत्वाच्या कागद पत्रासह सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. आता आमच्या घराच्या केवळ भिंतीच उरल्या आहे" अशी या घटनेबाबत माहिती सांगताना संतोष रामचंद्र गायकवाड यांना अश्रू अनावर झाले होते. हेही वाचा. पिंपरी: पवना, मुळा, इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठीचा चार कोटींचा निधी ‘पाण्यात’? हेही वाचा. पुणे : दारू पिऊन शिवीगाळ केल्याने एकाचा खून आता आम्ही कसं जगायचं हा प्रश्न निर्माण झाला असून मी एका कुरिअर ऑफिसमध्ये कामाला आहे, त्या ठिकाणी जेमतेम पगार आहे.या आगीच्या घटनेत आमच्याकडे काहीच उरले नाही. त्यामुळे राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून मदत करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.