‘इर्शाद’ या नावावरून सध्या पुण्यात बरीच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. हे नाव कवी संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या एका काव्यवाचन कार्यक्रमाचं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते हा कार्यक्रम सादर करतात. या कार्यक्रमाचं आयोजन दिवाळी पहाटच्या निमित्ताने पुण्यात करण्यात आलं होतं. मात्र, मराठी सण असलेल्या दिवाळीतील कार्यक्रमाला उर्दू नाव देण्यावरून त्यावर सोशल मीडियावर आक्षेप घेण्यात आला. हा वाद वाढत असल्याचं पाहिल्यानंतर संदीप खरे आणि वैभव जोशी यांनी या कार्यक्रमाचं नाव काव्य पहाट असं केलं आहे. या विषयावरून पुण्यात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय आहे प्रकरण?

संदीप खरे आणि वैभव जोशी हे ‘इर्शाद’ हा कवितांचा कार्यक्रम सादर करतात. करोना काळातील निर्बंध शिथिल केल्यानंतर राज्य सरकारने दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. त्यामुळे पुण्यातील आयोजकांनी या कार्यक्रमाचं दिवाळी पहाटच्या निमित्ताने आयोजन केलं. मात्र, त्याच्या इर्शाद या नावावर आक्षेप घेतला गेला. सोशल मीडिावर त्यावरून चर्चा सुरू झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandeep khare vaibhav joshi diwali pahat program irshaad name changed kavya pahat pmw
First published on: 28-10-2021 at 15:14 IST