पिंपरी चिंचवड: चोरीच्या आरोपावरून भंगार गोळा करणाऱ्या तीन व्यक्तींना लाकडी दांडके आणि हाताने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून थेट कायदा हातात घेत भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तींना मारहाण करण्यात आली आहे. याबाबत तक्रार देण्यास कोणी पुढे न आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही असे गुन्हे पोलीस निरीक्षक नितीन लांडगे यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितले.

हेही वाचा : निवृत्त सरकारी अधिकारी महेश झगडे यांचा कस्तुरबा रुग्णालयाला मदतीचा हात

Controversy over the initials Rama written on the body of a goat
बकऱ्याच्या अंगावर लिहिलेल्या राम आद्याक्षरावरून वाद; न्यायालयात नेमके काय घडले?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Kolkata Rape Case
Kolkata Rape Case : “मुलीच्या वेदना आठवल्या तरी…”, कोलकाता प्रकरणातील पीडितेच्या आईची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या…
gujrat bjp corporator allegation of misbehave
Gujarat : भाजपाच्या नगरसेविकाचा पक्षातील नेत्यावरच गंभीर आरोप; म्हणाल्या, “त्यांनी माझा हात पकडला अन् व्यासपीठावरून…”
bombay hc impose fine of two lakhs to accused and victim while canceling the rape case
बलात्काराचा गुन्हा रद्द करताना आरोपी आणि पीडितेला प्रत्येकी दोन लाखांचा दंड; सैनिकांसाठी दंडाची रक्कम वापरण्याची सूचना
Bank employee stabbed to death in pune
धक्कादायक : किरकोळ वादातून बँक कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून खून, हडपसर भागातील घटना; तीन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात
Justice Abhay Oak critical comment that only the court has the power to punish the accused
आरोपीला शिक्षा देण्याचा अधिकार केवळ न्यायालयाचा; न्यायमूर्ती अभय ओक यांचे परखड भाष्य
Rape in Uttarpradesh
Rape in UP : रात्री शौचास गेली अन् शाळेतील शिपायांनी रोखलं; १३ वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याने धक्कादायक प्रकार उजेडात!

तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तींना मारहाण झाली आहे. लोखंडी सळई चोरल्याचा आरोप घेऊन लाकडी दांडक्याने आणि हाताने बेदम मारहाण करण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तळेगाव पोलिसांनी देखील ही घटना घडल्याचे म्हटले आहे. पण, कायदा हातात घेऊन त्या व्यक्तींना मारहाण करणे कितपत योग्य आहे याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. ज्या व्यक्तींनी मारहाण केली आहे त्यांनी पोलिसांकडे जाऊन रीतसर तक्रार द्यायला हवी होती. परंतु, हातात कायदा घेऊन मारहाण केली. या अगोदर देखील महाराष्ट्रात आणि परराज्यात चोरीच्या आरोपावरून केलेल्या मारहाणीत काहींचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पोलिसांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.