पुणे : पाच पक्ष बदलणारे अमोल कोल्हे हेच महागद्दार आहेत. अशी टीका महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केली आहे. ते पिंपरी- चिंचवडच्या भोसरीमध्ये जाहीर सभेत बोलत होते. भोसरीमध्ये आढळराव यांच्यासाठी प्रचारसभा आयोजित केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवाजी आढळराव पाटील, महेश लांडगे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

विरोधक अमोल कोल्हे यांना मतदारांनी गेल्या पंचवार्षिक ला दिल्लीत पाठवलं. कोल्हे पुन्हा शिरूर लोकसभा मतदारसंघात दिसले नाहीत. मी पराभूत होऊन देखील पाच वर्षांपासून मतदारसंघात फिरत आहेत. विकास कामे करत आहे. अस आढळराव म्हणाले.

हेही वाचा…“अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही”; राज ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, “इतकी वर्ष ते…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, कोल्हे यांना १५ – २० गावाच्या वेशीवर अडवलं. त्यांना नागरिकांनी जाब विचारला. तुम्ही आमच्यासाठी काय केलं. अशी विचारणा करण्यात आली. मतदारांनी कोल्हे यांना फोन केल्यानंतर त्यांचे पीए हे अमोल कोल्हे यांच्या आवाजात बोलतात. पुढे ते म्हणाले, अमोल कोल्हे यांनी आत्तापर्यंत पाच पक्ष बदलले आहेत. मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार आणि शरद पवार गट अशा बेडूक उद्या त्यांनी घेतल्या. कोल्हे हेच खरे महागद्दार आहेत. अशी टीका शिवाजी आढळराव यांनी केली आहे.