पिंपरी : निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे पुढे येणे महत्त्वाचे असताना डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून टीका करण्यावर भर दिला जात असल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केला. त्यांनी कितीही टीका करू द्या, पण मी काम करण्यावर भर देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आळंदीतील संवाद मेळाव्यात आढळराव बोलत होते. आमदार दिलीप मोहिते, मनसेचे नेते बाबू वागस्कर, प्रकाश कुऱ्हाडे, किरण येळवंडे, राहुल चव्हाण, अजय तापकीर, योगेश रंधवे या वेळी उपस्थित होते. पाच वर्षांपूर्वी ज्यांना निवडून दिले, ते डॉ. कोल्हे अडीअडचणींना कधी धावून येत होते का? अडचणीच्या वेळेस धावून येणे, दोन गोड शब्द बोलणे एवढीच लोकांची अपेक्षा असते. तीसुद्धा पूर्ण करू शकले नाहीत. विकास तर दूरच राहिला. पंधरा वर्षांत मी गावा-गावांमध्ये निधी पोहोचविला. मागील वेळी माझा पराभव झाला. परंतु, हार मानली नाही. उलट ज्यांनी मतदान केले त्यांच्यासाठी लढत राहिलो. विविध योजना, प्रकल्प राबविण्याचा माझा मानस आहे. कोणाच्याही भावनेला बळी पडू नका, आपले प्रश्न डोळ्यासमोर ठेऊन, समस्या सोडवण्यासाठी कोणी काय केले आहे हे लक्षात ठेऊन मतदान करण्याचे आवाहन आढळराव-पाटील यांनी केले.

ajit pawar visit at rajkot fort malvan
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
Sharmila Thackeray on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Sharmila Thackeray : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शर्मिला ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे…”
Aaditya Thackeray
Aditya Thackeray : “ही निवडणूक आहे, लढाई नाही, त्यामुळे राजकीय पक्षांनी…”; छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया!
Aditya Thackeray criticized the Shinde government
शिंदे सरकार अदानींच्या खिशात; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका
Mahesh Landge, Mahesh Landge on amol kolhe,
पिंपरी-चिंचवड: लंडनमधील २०० कोटींचे हॉटेल कुणाचं? आमदार महेश लांडगे यांनी केलं स्पष्ट; म्हणाले, पुरावे दिल्यास…
minister hasan mushrif
नितेश राणे यांच्या विधानाकडे देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने पाहावे, मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी

हेही वाचा – पुणे : ससूनमध्ये राजकारण जोमात, रुग्णसेवा कोमात! उपचार अन् औषधाविना रुग्णांचे हाल

हेही वाचा – पुणे : कौटुंबिक वादातून वडिलांनीच दिली मुलाची सुपारी, जंगली महाराज रस्त्यावरील गोळीबाराचा उलगडा

मोहिते म्हणाले, की आळंदीकरांनी दरवेळी आढळरावांना मताधिक्य दिले आहे. त्यांना खासदार करण्यामागे आळंदीकरांचा मोठा हात आहे. या भागातून रेल्वे जाणार असल्यामुळे आळंदीचे महत्त्व वाढणार आहे. चाकण, आळंदीची महापालिका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आळंदीतील पाण्याचा प्रश्न संपविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे काम करणाऱ्यांच्या मागे आपण गेले पाहिजे.