पुणे: करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष कार्यदलाची (टास्क फोर्स) स्थापना करण्यात आली होती. आता राज्य सरकारने पुन्हा एकदा टास्क फोर्सची स्थापना केली आहे. मात्र, हा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. तज्ज्ञांची पूर्वसंमती न घेता त्यांचा या टास्क फोर्समध्ये समावेश करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. याचबरोबर या सदस्यांच्या नावातही चुका करण्यात आल्याने सरकार याकडे किती गांभीर्याने पाहते, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत १३ एप्रिल २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष कार्यदलाची (टास्क फोर्स) स्थापना करण्यात आली होती. राज्यात पुन्हा एकदा करोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. तसेच करोना विषाणूचा जेएन. १ या उपप्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी जाहीर केले होते.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

हेही वाचा… आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याला पुणेकरांची पसंती! जाणून घ्या नेमके कारण…

या टास्क फोर्समध्ये अध्यक्षस्थानी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (नाशिक) कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय ( पुणे) येथील डॉ. राजेश कार्यकर्ते, राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेतील डॉ. वर्षा पोतदार आणि नवले वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) येथील डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत, तर आरोग्य सेवा आयुक्त सदस्य सचिव असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णयही काढण्यात आला आहे. यातील तज्ञ्ज सदस्यांना राज्य सरकारने या टास्क फोर्सबाबत काहीच कळविले नसल्याच्या बाबीवर आता अनेक सदस्यांनी बोट ठेवले आहे.

नावातील दुरुस्ती २४ तासांनी

सरकारने आधी संपर्क साधला नसल्याला जनुकीय क्रमनिर्धारणचे राज्य समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दुजोरा दिला. त्यावेळी त्यांनी याबाबत आधी विचारणा झाली नसल्याची कबुली दिली. याचबरोबर त्यांचे नाव राजेशऐवजी सुरेश करण्यात आले होते. टास्क फोर्सची स्थापना मंगळवारी झाल्यानंतर अखेर बुधवारी सायंकाळी सार्वजनिक आरोग्य विभागाने डॉ. कार्यकर्ते यांच्या नावात योग्य सुधारणा केली.

राज्य सरकारने आधी स्थापन केलेल्या कोविड टास्क फोर्समध्ये माझा समावेश होता. यावेळी टास्क फोर्समधील समावेशाबाबत सरकारकडून कोणतीही विचारणा झाली नाही. टास्क फोर्समध्ये समावेश झाल्याची बाब माध्यमांमधूनच निदर्शनास आली. – डॉ.वर्षा पोतदार, वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था

टास्क फोर्स काय करणार?

  • गंभीर व अतिगंभीर आजारी करोना रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रणाली स्थापन करणे.
  • कोविड-१९ क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे.
  • गंभीरपणे आजारी कोविड-१९ रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध नियमावलीची शिफारस करणे.