पूर्वलक्ष्यी कर आकारणीचा निर्णय रद्द होणारच, सरकार व्यवसायस्नेहीपणा दाखवणारच, असे काहीही गेल्या नऊ वर्षांत घडले नाही. जेव्हा घडले, तेव्हा कारणे निराळीच..
सरकार कोणत्याही पक्षाचे असो. वाईट निर्णयांच्या अंमलबजावणीत कोणत्याही पक्षाच्या सरकारांत कवडीचाही गुणात्मक फरक नसतो याचे दर्शन गतसप्ताहाच्या अखेरीस पूर्वलक्ष्यी कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय घडवतो. वाइटाचा पायंडा अधिक पडतो हे लक्षात घेत सरकार नामक यंत्रणेने कोणताही निर्णय घेण्याआधी किती अंगाने त्याच्या परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे, हेदेखील या निर्णयातून समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक कंपन्यांवर पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारणीचा अधिकार स्वत:कडे घेणारा कायदा करण्याचा निर्णय काँग्रेस सरकारचा. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारातील अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी २०१२ सालचा अर्थसंकल्प मांडताना हा धक्कादायक निर्णय घेतला. त्याच वेळी ‘लोकसत्ता’सह अनेक विश्लेषकांनी त्या निर्णयातील धोका दाखवून दिला होता. पण त्या सरकारच्या दुसऱ्या कालखंडात मनमोहन सिंग हतबल होते आणि मुखर्जी शिरजोर. त्यामुळे त्या धोक्याकडे कोणी लक्ष देण्याची शक्यता नव्हती. तसेच झाले. यामुळे करसुधारणांसाठी १९६२ पर्यंत मागे जाण्याचा सरकारने स्वत:च स्वत:ला दिलेला अधिकार अबाधित राहिला. हा मनमोहन सिंग सरकारास अखेरची घरघर लागण्याचा काळ. ‘कर दहशतवाद’सारखा टीकात्मक मुद्दा या अशाच निर्णयांमुळे जन्माला आला आणि विरोधी पक्ष भाजपने त्याचे यथास्थित आणि रास्त भांडवल केले. नंतर दोन वर्षांत झालेल्या निवडणुकांत साहजिकच हा निर्णय मागे घेण्याचे आश्वासन भाजपने दिले. इतकेच नव्हे तर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या झगमगत्या परदेशी दौऱ्यांतही गुंतवणूकदारांना तसाच शब्द दिला. त्यामुळे हा अत्यंत मागास निर्णय रद्दबातल होणार अशीच सर्वाची अपेक्षा.

Web Title: Cairn to seize indian assets videocon bankruptcy kumar mangalam birla zws
First published on: 10-08-2021 at 00:48 IST