पी. चिदम्बरम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरे तर देशात काय घडू पाहात आहे याचा उघड उघड इशारा मिळाला होता. विरोधी पक्षांना काय होऊ घातले आहे हे समजत होते, पण विरोधातील नेत्यांच्या कोत्या सल्लागारांनी या नेत्यांना कोते सल्ले देऊन रोखले असावे. तमिळनाडू वगळता कुठल्याही रणांगणावर युद्धासाठी सज्ज असलेले सैन्य तातडीने पाठवण्यात आले नाही. पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी अजून व्हायची होती; बिहारमध्ये, नितीश कुमार यांनी त्यांचेच पेटंट असलेल्या कोलांटउडया मारत इंडिया आघाडीची बिघाडी करण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. महाराष्ट्रात, मित्रपक्ष जागावाटपावर वाद घालत आहेत, तर भाजप विरोधी पक्षातल्या नेत्यांची शिकार करण्यात व्यग्र आहे; उत्तर प्रदेशात, सपा आणि काँग्रेस एकत्र आले आहेत, पण अजून तरी ते लढाईत सामील झाल्याचे दिसत नाही; आणि दिल्ली आणि झारखंडमध्ये, सैन्य तयार आहे, पण सेनापती तुरुंगात आहेत. फक्त तमिळनाडूमध्ये इंडिया आघाडी आणि तिच्या विरोधी पक्षात सुरू असलेल्या संघर्षांने ‘सुरुवात चांगली झाली तर अर्धी लढाई जिंकली झाली’ या म्हणीची आठवण करून देण्यास सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: P chidambaram article the final assault on constitution zws
First published on: 31-03-2024 at 05:50 IST