राजेश बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरूची महती सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात :  सद्गुरू ज्ञानस्वरूप आहे असे धरूनच सद्गुरूची महती ठिकठिकाणी गायिली जाते. ज्ञानामध्ये जरी प्रकार असले तरी त्या ज्ञानाचे अंतिम लक्ष आत्मज्ञान, स्वरूपज्ञान, अंतरज्ञान, सम्यकज्ञान असेच योजिले गेले आहे. हे जरी खरे असले तरी भक्तगण ‘ज्ञानाद्वारे गुरूकडे’ जाण्यापेक्षा गुरूकडे प्रथम जातात व अन्य प्रकाराने श्रद्धा वाढवतात. चमत्कार इत्यादींच्या प्रभावामुळे खऱ्या सदाचाराला, नीतीला, उपासनेला, तसेच इंद्रिय संयमाला, आत्मज्ञानाला (अशा शिष्यांकडून) दूरच ठेवले जाते आणि हा गुरू सांगेल तेच सर्व काही, असे गृहीत धरून गुरूचे जे खरे मार्गदर्शन असते ते विसरतात. त्याने समाजात मोठीच दरी निर्माण होते आणि मग खरे संत कोण, गुरू कोण हा प्रश्न निर्माण होतो. माझ्या मते गुरूला ज्ञानानेच ओळखले जावे व तेही परोक्षज्ञानापेक्षा अपरोक्ष ज्ञानाच्या अनुभवाने ओळखले जाणे जरुरी आहे.

More Stories onमराठीMarathi
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukdoji maharaj explaining the importance of guru zws
First published on: 03-07-2023 at 04:52 IST