-डॉ. गिरीश पिंपळे
साधारण गेल्या ५० वर्षांत विज्ञानाने जी झेप घेतलेली आहे तिचे वर्णन ‘अतर्क्य’ या एकाच शब्दात करता येईल. विज्ञानात होणाऱ्या प्रगतीची फळे सामान्य माणसापर्यंत झपाट्याने पोहोचत आहेत. आपल्यापैकी प्रत्येकजण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कळत – नकळत (बहुतेक वेळेला नकळतच !) विज्ञानाची अनेक तत्त्वे / उपकरणे सतत वापरत असतो. विज्ञानाच्या या गरुडभरारीमागे आहे अखंडपणे आणि मोठ्या चिकाटीने व्यापक प्रमाणावर चालू असलेले संशोधन. संशोधनाच्या दृष्टीने विचार केला तर विज्ञानाचे दोन भाग पडतात – गणिती (सैद्धांतिक) आणि प्रायोगिक. एखाद्या व्यक्तीने केलेले गणिती संशोधन कितीही नवीन किंवा क्रांतिकारी असले तरी त्याला लगेच मान्यता मिळत नाही. ते प्रयोगाने सिद्ध व्हावे लागते. या दोन घटनांमध्ये कितीही काळ जाऊ शकतो. इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायला हवी. विज्ञान व्यक्तीला ओळखत नाही – ते फक्त वस्तुस्थितीला ओळखते. याचा अर्थ असा की आइनस्टाईनचा कितीही मोठा दबदबा असला तरी त्याने मांडलेले संशोधन लगेच मान्य होत नाही. त्या संशोधनाला विशिष्ट प्रक्रियेतून जावेच लागते. म्हणजे एखादे गणिती संशोधन आणि त्याची प्रायोगिक पडताळणी यात किती काळ जाईल हे सांगता येत नाही. त्यासाठी त्या वैज्ञानिकाला प्रतीक्षा करावी लागते. हे सगळे आत्ताच प्रकर्षाने आठवण्याचे कारण म्हणजे अगदी अलीकडे मरण पावलेले ब्रिटीश वैज्ञानिक पीटर हिग्ज आणि त्यांनी केलेली अशी प्रतीक्षा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा