सतीश देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या दलितांच्या सद्य:स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नवा राष्ट्रीय आयोग नेमण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे वृत्त स्वागतार्ह असले, तरी ते काहीसे विचारात पाडणारे आहे. स्वागतार्ह कसे, ते खुलासेवार पाहूच. पण ‘काहीसे विचारात पाडणारे’ का , याचे उत्तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांनीच स्वत:ची जी प्रतिमा बहुसंख्य समर्थकांमध्ये तयार करून ठेवली आहे, तिच्याशी निगडित आहे. हे सत्ताधारी ज्या हिंदुत्वाचा उद्घोष करतात, त्या हिंदुत्व या संकल्पनेचे उद्गाते वि. दा. सावरकर यांनी ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्मांना ‘परके’ मानले होते. अशा ‘परक्या’ धर्मांबद्दल विचार करून आजच्या सत्ताधाऱ्यांना काय साधायचे आहे- किंवा काय केल्यासारखे दाखवायचे आहे, असा प्रश्न पडतो, म्हणून विचारात पाडणारे. तेव्हा या प्रस्तावित निर्णयामागच्या हेतूंची चर्चा पूर्णत: बाजूला ठेवून आपण त्याचे स्वागत करू. कारण दलित (किंवा ‘पूर्वास्पृश्य’ जातींमधले लोक) जरी ख्रिस्ती वा मुस्लीम धर्मात गेले तरीही त्यांची स्थिती बदललेली नाही, हे उघड दिसणारे आहेच.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government policy now is christian and muslim community will get reservation asj
First published on: 22-09-2022 at 10:54 IST