नीरजा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय असते नेमकी कविता? तीव्र भावभावनांचा उत्स्फूर्त आविष्कार की मनात उठलेल्या कल्लोळाला मिळालेला नेमका आवाज? नेमक्या शब्दांसाठी करावा लागणारा शोध की त्या शब्दांच्या शोधानंतर उमजल्यासारखं वाटणारं अगम्य काही? अस्वस्थ मन भरून येतं अनेक भावभावनांनी आणि मोकळं होईल पाऊस पडून गेल्यानंतरच्या निरभ्र आकाशासारखं; पडलेल्या पावसानंतर मातीत रुजलेले शब्द तरारून येतील आणि फुटेल एखादी कविता शब्दांच्या झाडाला असं वाटतं राहतं. कधी कधी होतं असं पण अनेकदा विरून जातात शब्द आणि अर्धवट रुजलेल्या गर्भासारखी निसटून जाते कविता ओटीपोटातून. मग पुन्हा वाट पाहायची शब्द रुजण्याची; कवितेचा गर्भ राहण्याची; प्रसूतीची, त्या वेळेला अनुभवायच्या वेणांची आणि कागदावर उतरल्यावर समाधानानं सोडलेल्या सुस्काऱ्याची. अर्थात हे असं समाधान काही क्षणांसाठीच असतं. कारण बाहेरचं जग, त्यातले ताणेबाणे सतत आदळत असतील कवीवर तर कशी थांबेल त्याच्या मनाची तगमग?

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Difficult times recover what is exactly poetry emotions words power freshness life ysh
First published on: 27-02-2022 at 00:02 IST