फुलातील परागकण मधमाश्यांच्या पायांना चिकटून सगळीकडे पसरतात. त्यामुळे वनस्पतींच्या पुनरुत्पादनातील मोठी प्रक्रिया पूर्ण होत असते. त्यामुळे परागकणांचे महत्त्व मोठे आहे. मात्र याच परागकणांमुळे अ‍ॅलर्जी होऊन माणसाला अस्थमासारखे विकारही होतात. परागकणांचे एक शास्त्र आहे, त्याला पॅलिनॉलॉजी म्हणतात. या शास्त्रातील आपल्या देशातील सर्वोच्च वैज्ञानिक पी.के.के. नायर हे होत, त्यांचे नुकतेच निधन झाले. भारतात परागकणशास्त्राचा विकास व प्रसार त्यांनीच केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सपुष्प वनस्पतींमध्ये अँजियोस्पर्मस असतात, त्याबाबतचा ‘ट्रायफायलेटिक सिद्धांत’ त्यांनी मांडला होता. हवेत असणाऱ्या कणांचा डेटाबेस त्यांनी एरोस्पोरा नावाने तयार केला होता. या कणांमुळे मानवाला अ‍ॅलर्जी होऊन श्वासाचे विकार जडत असतात. जैवतंत्रज्ञान अभ्यासतंत्रे वापरून त्यांनी काही नर जनुके शोधून काढली होती, ती वनस्पतींच्या उत्पादनात सुधारणा करणारी होती. त्यांनी एकंदर २० पुस्तके लिहिली व २५० शोधनिबंध प्रकाशित केले.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr p k k nair
First published on: 25-01-2017 at 03:31 IST