‘पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरणतज्ज्ञच असायची गरज नसते. एखाद्या शेतक ऱ्याला विचारा की पिकांच्या चांगल्या वाढीसाठी मधमाश्यांची पोळी भाडय़ाने घेण्यासाठी तो किती पैसे मोजतो, कारण आता निसर्गात पुरेशा मधमाश्याच नाहीत. त्यामुळे परागीभवन कमी होते व पिकांवर त्याचा वाईट परिणाम होतो. पण मधमाश्या काही त्यांच्या या कामासाठी निविदा तर काढत नसतात, त्यामुळे त्यांच्या कामाचे मूल्य समजत नाही,’ हे निरीक्षण नोंदवले आहे पर्यावरण अर्थशास्त्रज्ञ पवन सुखदेव यांनी. ‘सामान्यांचे पर्यावरणतज्ज्ञ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सुखदेव यांना अलीकडेच, पर्यावरण क्षेत्रातले नोबेल मानला जाणारा ‘टायलर पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरे तर ते व्यवसायाने बँकर. डॉइश बँकेत ते व्यवस्थापकीय संचालक होते. ‘पर्यावरणातील कुठल्याही क्रियेचे आर्थिक मूल्य असते, झाडांनी वातावरणात सोडलेल्या ऑक्सिजनची किंमत असते’ हा विचार त्यांनी मांडला. २००८ पासून ते पर्यावरणतज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत. सुखदेव यांनी ‘द इकॉनॉमिक्स ऑफ इकोसिस्टीम्स अँड बायोडायव्हर्सिटी’ हा संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या वतीने सादर केला जाणारा पहिला अहवाल लिहिला होता. त्यात त्यांनी निसर्गाचे आपण किती देणे लागतो याचा ताळेबंद बँकर या नात्याने मांडला होता. निसर्ग भांडवलाची आर्थिक किंमत त्यांनी पहिल्यांदा सांगितली व हरित अर्थशास्त्राच्या माध्यमातून रोजगार कसे निर्माण होतात व दारिद्रय़ निर्मूलनकसे करता येते हे दाखवून दिले.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian environmental economist pavan sukhdev profile
First published on: 13-02-2020 at 01:05 IST