अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतासाठी आज होणाऱ्या स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये देखील मोठा विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यासाठी अफगाणिस्तानविरुद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे वाढलेला आत्मविश्वास टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, त्यासोबतच सध्या चर्चा आहे ती विराट कोहली आणि टॉसच्या असलेल्या व्यस्त कनेक्शनची! यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टॉस न जिंकल्यामुळे टीम इंडियाच्या धोरणावर त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, हे आत्ताच नसून कर्णधार विराट कोहलीचा टॉससोबत कायमच ३६चा आकडा असल्याचं आकडेवारी सांगते. क्रिकेट समालोचक आणि माजी खेळाडू आकाश चोप्रा यानं विराटचं टॉसशी असलेलं हे नातं स्पष्ट करून सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टॉस जिंकणं महत्त्वाचं, पण…!

एका यूट्यूब चॅनलसोबत बोलताना आकाश चोप्रानं आजच्या स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची रणनीती कशी असावी, याविषयी काही मुद्दे मांडले. यामध्ये टॉस जिंकण महत्त्वाचं असल्याचं तो म्हणाला. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा टॉससोबत ३६चा आकडा असल्याचं आकडेवारी सांगते. यावेळी बोलताना आकाश चोप्रानं ही आकडेवारी समोर ठेवत गेल्या ५० वर्षांतला हा सर्वात वाईट रेकॉर्ड असल्याचं तो म्हणाला आहे.

मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akash chopra saye virat has worst toss record as captain in last 50 years pmw
First published on: 05-11-2021 at 15:08 IST