ठाणे जिल्ह्य़ात सोमवारी दिवसभरामध्ये १ हजार ५१० नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा ४३ हजार ९२६ इतका झाला आहे.

जिल्ह्यात ३९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकुण मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजार ३०८ वर पोहचली आहे. ठाणे जिल्ह्य़ात सोमवारी १ हजार ५१० नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील ४१३, ठाणे शहरातील २६८, ठाणे ग्रमीणमधील १६७, नवी मुंबईतील १६४, उल्हासनगर शहरातील १५९, मीरा भाईंदरमधील १५७, भिवंडी शहरातील ८८, अंबरनाथ शहरातील ५६ आणि बदलापूर शहरातील ३८ रुग्णांचा समावेश आहे. तर, सोमवारी जिल्ह्य़ात ३९ करोना रुग्णांचा मृत्यु झाला असून त्यामध्ये ठाण्यातील १४, नवी मुंबईतील ८, अंबरनाथ ५, कल्याण-डोंबिवलीमधील ४, मीरा-भाईंदरमधील ४, उल्हासनगरमधील ३ आणि बदलापूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.