जिल्ह्य़ात बुधवारी दिवसभरामध्ये ४५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये भिवंडीतील २१ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्य़ात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५९५ वर पोहोचली आहे. तर, दिवसभरात जिल्ह्य़ामध्ये ७०५ नवे करोना रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्य़ातील बाधितांची संख्या १७ हजार ८२३ वर पोहोचली आहे.

बुधवारी भिवंडीतील २१, ठाण्यातील ८, मीरा-भाईंदरमधील ५, नवी मुंबईतील ५, ठाणे ग्रामीणमधील ३, कल्याणमधील २ आणि अंबरनाथमधील एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, ठाणे शहरात १९०, नवी मुंबई १२८, कल्याण-डोंबिवली शहरात १३५, भिवंडी शहरात ३७, अंबरनाथ ४०, उल्हासनगर ४१, बदलापूर शहरात १७, मीरा-भाईंदर शहरात ९० आणि ठाणे ग्रामीणमध्ये २७ नवे रुग्ण आढळले आहेत.