इन फोकस

निवडणुका मग त्या गल्लीतल्या असोत वा दिल्लीतल्या. त्या प्रचाराच्या अविभाज्य घटक असतात. येनकेनप्रकारे मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे उमेदवार आपापले पाठीराखे जमवून घरोघरी, गल्लोगल्ली फिरत असतात. सध्या कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीच्या निमित्ताने मुख्य रस्त्यांवर मिरवणुकांची रेलचेल आहे. लोकसभा-विधानसभेच्या तुलनेत महापालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग फारच लहान असल्याने सध्या प्रत्येक विभागात एकामागोमाग एक मिरणुकांची रांगच लागेली आहे. ‘आम्हालाच निवडून द्या, कारण की’ अशा अविभार्वाच्या या मिरवणुकांमधून वारेमाप आश्वासनांची बरसात केली जात आहे..