अनेक मृत कर्मचाऱ्यांची पत्नी, मुलांचे अर्ज बाद ठरण्याची भीती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महापालिकेच्या सेवेतील कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास अथवा आजारपणामुळे अकार्यक्षम ठरल्यास त्याची पत्नी अथवा मुलांना माणुसकीच्या नात्याने अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येते. परंतु, अनुकंपा तत्त्वावर नोकरी देताना वयाबाबतचे वेगवेगळे नियम लावून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे नातलग अपात्र कसे ठरतील असे पालिकेचे धोरण राहिले आहे. आता अनुकंपा तत्वावर देण्यात येणाऱ्या नोकरीसाठीही वयोमानाची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी पालिकेच्या सेवेत नोकरी मिळविण्यासाठी केलेले अर्ज बाद होण्याची चिन्हे आहेत. प्रशासनाने एक परिपत्रक काढून हे बंधन घातल्यामुळे पालिकेतून माणूकीचा झरा आटू लागल्याची टीका कर्मचारी वर्गाकडून केली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc put age limit for special cases job
First published on: 06-10-2015 at 00:04 IST