शहापूर : तालुक्यातील भातसा धरणाचे पाचही दरवाजे शनिवारी सकाळी उघडण्यात आले. भातसा धरण परिसरात पावसाचे वाढणारे प्रमाण लक्षात घेऊन धरणाचे दरवाजे ०.५० मीटर ने उघडण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यामधून ९ हजार ६३०. ४०  क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होत असल्याने भातसा नदीकाठी वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणारी  शहापूर तालुक्यातील तानसा व वैतरणा याआधीच भरून वाहू लागली आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dam gates of bhatsa dam opened akp
First published on: 12-09-2021 at 00:20 IST