ठाणे : नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अति धोकादायक इमारतींचा पाणी आणि वीजपुरवठा तात्काळ खंडित करावा आणि या इमारती तातडीने रिकाम्या कराव्यात, असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी नुकतीच बैठक घेतली. रिक्त करायच्या अति धोकादायक इमारती, त्यातील अडचणी, पर्यायी व्यवस्था, संक्रमण शिबिरे याबाबत चर्चा झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ८६ अति धोकादायक इमारती आहेत. त्यातील ३७ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तर, ४९ इमारतींमध्ये नागरिक राहत आहेत. या ४९ अति धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले आहेत. या इमारत अति धोकादायक असल्याचे फलक लावावेत. या इमारतींमधील नागरिकांनी तात्काळ पर्यायी जागेत स्थलांतरित व्हावे. अति धोकादायक अधिकृत इमारतींमधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था होत नसल्यास, तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यकता भासल्यास, तात्पुरती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Evacuate high risk buildings orders of thane municipal commissioner ysh
First published on: 29-05-2023 at 00:02 IST