ठाणे – वर्तकनगर परिसरातील रौनक रेसिडेन्सी जवळ उभ्या असलेल्या रिक्षाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी १.१६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या आगीत रिक्षा संपूर्णपणे जळून खाक झाली असली, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ठाणे शहरातील वर्तकनगर परिसरातील रौनक रेसिडेन्सी जवळ रिक्षा उभी करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी १.१६ वाजताच्या सुमारास अचानक या रिक्षाला आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच, वर्तकनगर पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी रिक्षाला लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रिक्षा जळून खाक झाली आहे.