ठाणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासकीय रुग्णालयात भरती झालेल्या कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरतीमध्ये ५० टक्के आरक्षण मिळावे तसेच समान काम समान वेतन मिळण्यासाठी राज्याच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी कृती समितीने बुधवारी काम बंद आंदोलन करत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात ७०० ते ८०० कर्मचारी सहभागी झाले होते. येत्या अधिवेशनात २३ हजार कर्मचाऱ्यांचा मोर्चा नागपूर येथे धडक देणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा… ठाण्यातील गायमुख चौपाटीचा काही भाग खचला, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात लावण्यात आली धोकापट्टी

Schools closed in Pimpri city municipal commissioner order to be vigilant with emergency system
पिंपरी : शहरातील शाळा बंद, आपत्कालीन यंत्रणेने दक्ष राहण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश
Solapur, ransom, Municipal Health Officer,
सोलापूर : महापालिका आरोग्याधिकाऱ्यास दोन कोटींची मागितली खंडणी; प्रहार संघटनेच्या नेत्यासह दोन पत्रकारांवर गुन्हा दाखल
15 ips officers transferred from maharashtra
राज्यातील १५ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Officer, maharashtra, mahabeej,
राज्यातील सनदी अधिकाऱ्यांना महाबीजच्या ‘एम.डी.’ पदाचे वावडे, १४ वर्षांत २० अधिकाऱ्यांची नेमणूक
medigadda Dam, Damage,
गडचिरोलीतील मेडीगट्टा धरणामुळे शेतजमिनीचे नुकसान, उच्च न्यायालयात याचिका…
farmers Member of sugar factory raise Slogan against MLA Prakash Abitkar
‘बिद्री’च्या सभासदांचा भर पावसात मोर्चा;आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात घोषणाबाजी
case filed against shiv sena shinde group district chief for threat and extortion contractor
शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुखावर ठेकेदाराला धमकावत खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल
onion, Nashik, Central Agriculture Committee,
लोकसभा निकालानंतर प्रथमच केंद्रीय कृषी समिती नाशिक दौऱ्यावर, सरकारी कांदा खरेदीतील त्रुटी शोधण्यावर लक्ष

हेही वाचा… ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध शासकीय रुग्णालयात गेले १५ ते १६ वर्ष कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी आरोग्य सेवा देत आहेत. करोना काळातही केंद्र सरकार तसेच राज्य सरकार मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य विषयक उपक्रमांमध्ये या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. परंतु तूटपूंजे मानधन मिळत असल्याचा आरोप अधिकारी- कर्मचारी करत आहेत. या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत बिनशर्त समायोजन करावे यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी कृती समितीने आझाद मैदान येथे मागील महिन्यात आक्रोश आंदोलन पुकारले होते. त्यांची आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भेट घेऊन यापुढे शासकीय भरतीमध्ये ३० टक्के आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा केली. परंतु, अद्याप लेखी स्वरुपात कोणतेही शासन निर्णय प्राप्त झालेले नाहीत. यानंतरही अनेकदा मंत्रिमंडळ बैठका झाल्या, मात्र शासन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या मागण्याकडे सकारात्मक प्रतिसाद देत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरुच ठेवले आहे. या कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन करत ठाणे जिल्हा आरोग्य विभाग ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांना मागण्याचे निवेदन दिले.