बदलापूर शहरात गेल्या दोन दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बुधवार आणि गुरूवार अशा दोन दिवशी शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा झाला. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वच्छता प्रक्रियेमुळेच सुरूवातीला गढूळ पाणी येत असल्याचा दावा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये गोळीबार करणाऱ्या तरूणास शहाडमधून अटक; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 

Hetwane Dam, heavy rains, Pen taluka, water cut, Kharghar, Ulwe, Dronagiri, Raigad district, drinking water, CIDCO, water storage, dam gates, water release, Bhogeshwari riverside, water tankers,
हेटवणे धरणाचे ६ दरवाजे उघडले आता तरी पाणी कपात रद्द करा – रहिवाशांची मागणी
st bus, flood water, driver suspended, video viral,
VIDEO : पुराच्या पाण्यातून एसटी घातली, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चालकाचे निलंबन
Thane, garbage crisis, waste collection, water scarcity, monsoon, disease spread, landfill space, solid waste planning, waste transport, Daighar project, Ghodbunder, municipal corporation, public representatives, epidemic diseases, dengue, malaria, traffic congestion, solid waste plant, alternative site
ठाणे : ऐन पावसाळ्यात ठाणेकरांपुढे कचरा समस्या, वाहनांसह प्रकल्प बंद पडण्याबरोबरच कोंडीमुळे नियोजन बिघडल्याचा प्रशासनाचा दावा
water storage increasing in ujani dam
उजनी धरणात पाण्याचा विसर्ग वाढल्याने सोलापूरकर सुखावले 
Nashik city, Nashik city to Experience Complete Water Shutdown, water shutdown in nashik, nashik news,
नाशिक : शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद
ash of khaparkheda thermal power plants found in kanhan river
खापरखेडा वीज केंद्राची राख कन्हान नदीत.. दूषित पाण्यामुळे नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात..
How to drive through waterlogged roads during monsoons 5 tips for driving safely through floods
पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहन कसे बाहेर काढावे? या महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करा
Why you should steer clear of sprouted potatoes
कोंब आलेले बटाटे खाताय? थांबा, असे करण्यापूर्वी बटाट्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घ्या

बदलापूर शहराला उल्हास नदीवर असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बॅरेज बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला जातो. येथे असलेल्या प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करून ते शहरातील विविध जलकुंभांमध्ये पुरवले जाते. येथून शहराच्या विविध भागात ते पाठवले जाते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून बदलापूर शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. माती मिश्रीत असल्यासारखे हे पाणी असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पाण्यामुळे रोगराई आणि विकार पसरल्याची भीतीही व्यक्त होत आहे. याबाबत जीवन प्राधिकरणाच्या बदलापूर कार्यालयाशी संपर्क केला असता, नुकतेच मुख्य जलकुंभांची सफाई करण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे पाणी पुरवठा जसजसा सुरळीत होईल तसतसा हे पाण्याचे प्रमाण कमी होईल असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र या गढूळ पाण्यामुळे नागरिकांत मात्र संतापाचे वातावरण आहे.