उल्हासनगर: कार्यालयीन वेळ चुकवत कायमच उशिराने कार्यालयात येणाऱ्या उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांचा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. स्वयंचलित हजेरी पद्धत असतानाही हे कामगार उशिराने येत असल्याने त्याचा कामकाजावर परिणाम होत होता. त्यात विभाग प्रमुखही कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

हेही वाचा >>> डोंबिवलीत भोपर रस्ता कमानीच्या कामासाठी २५ दिवसांपासून बंद ; नोकरदार, विद्यार्थी, नागरिकांचे हाल

term of Nagpur Zilla Parishad will end on 17th january and administrative rule will be imposed from Friday
जिल्हा परिषद ते महापालिका : प्रशासकीय राजवटीचे वर्तुळ पूर्ण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Sanjay Raut On Mumbai Municipal elections 2025
Sanjay Raut : महाविकास आघाडीत फूट? “काय होईल ते होईल, आम्ही सर्व महापालिका स्वबळावर लढवणार”, ठाकरे गटाची मोठी घोषणा
Mumbai Highcourt
Mumbai Highcourt : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मुंबई उच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली
Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra News Updates : महापालिका निवडणूक मनसे महायुतीबरोबर लढवणार का? मनसे नेत्याचं मोठं विधान
mahayuti , Municipal Elections, leaders MNS ,
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत सामील व्हा, मनसेच्या बैठकीत प्रमुख नेते मंडळींचा सूर
MLA Satej Patil urged workers after assembly defeat
विधानसभा अपयशाने खचणार नाही ; उभारी घेऊ सतेज पाटील

हेही वाचा >>> डोंबिवली : लोढा हेरिटेजमध्ये पेट्रोल चोरी करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला रहिवाशांनी पकडले

उल्हासनगर महापालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित आहेत. अनेक अधिकारी आणि कर्मचारी कमी असल्याने पालिकेच्या कारभारावर त्याचा परिणाम होतो आहे. त्यामुळे अनेक पदांवर प्रभारी पध्दतीने कनिष्ठ कर्मचारी नेमले आहेत. मात्र याच कर्मचाऱ्यांकडून पालिकेच्याच नियमांना हरताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे. उल्हासनगर महापालिकेचे अनेक कर्मचारी ठरलेल्या वेळेपेक्षा उशिराने मुख्यालयात पोहोचत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत अनेक कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कर्मचारी ठरलेल्या वेळेपेक्षा उशिराने येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सोमवारी या कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने धक्का दिला. सकाळी दहा नंतर पालिकेतील वरिष्ठ अधिकारी यांनी प्रवेशद्वार गाठत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुष्प दिले. यावेळी कर्मचाऱ्यांना वेळेचे भान राखण्याचे आवाहन करण्यात आले. विशेष म्हणजे पालिका मुख्यालयात स्वयंचलित बायोमेट्रिक हजेरी पद्धत कार्यरत आहे. त्यानंतरही कर्मचारी उशिराने येत असल्याने पालिकेच्या नियमांचा या कर्मचाऱ्यांना धाक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Story img Loader