ठाणे : जातीयवाद निर्माण करून महाराष्ट्राची शांतता भंग केली जात आहे. निवडणूकीच्या तोंडावर हे सर्व प्रकार सुरू होत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, कालांतराने कळेलच, असे सुचक विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी ठाण्यात केले. तसेच राज्यातील राजकीय परिस्थिती संभ्रमावस्थेतील आणि घाणेरडी असल्याचेही ते म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी ठाणे येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जातीयवाद निर्माण करून महाराष्ट्राची शांतता भंग केली जात आहे. निवडणूकीच्या तोंडावर हे सर्व प्रकार सुरू होत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, कालांतराने कळेलच, असे ते म्हणाले. ज्या विषयांमुळे तुम्ही त्रस्त असता. त्या विषयांपासून तुम्हाला भरकटवले जाते, अशी टिकाही त्यांनी केली. राज्यातील राजकीय परिस्थिती संभ्रमावस्थेतील आणि घाणेरडी झालेली आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदारांची भिती वाटायला हवी. परंतु राजकीय पक्ष उघडपणे मतदारांना मुर्ख समजतात. पाच वर्ष खड्डे, बेरोजगारी या विषयावर बोलायचे आणि शेवटी मतदान करताना वेगळ्याच मुद्द्यावर मतदान करायचे असे मतदारांनी केल्यास त्यांची किमंत काय राहणार, मतदार नुसता सुशिक्षित असून नाही तर सूज्ञ असावा लागतो, असेही ते म्हणाले. 

dispute in sant Dnyaneshwar maharaj palkhi sohla
माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद
shinde group replied to uddhav thackeray criticism on budget
“राज्यात बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “संजय राऊतांच्या संगतीने…”
Poet Narayan Surve
नारायण सुर्वे यांच्या घरी चोराने मारला डल्ला, नंतर चिठ्ठी लिहून परत केली वस्तू; म्हणाला, “मला माहीत नव्हतं..”
female ias officers in maharashtra ias officer sujata saunik controversial ias officer pooja khedkar
उथळ अधिकाऱ्यांचा पर्दाफाश!
pooja khedkar audi challans
IAS Pooja Khedkar यांच्या कारने वाहतुकीचे तब्बल २१ नियम मोडले, २७ हजारांची दंडवसुली थकित
Bhagirath Bhalke meet Sharad Pawar
भगीरथ भालके शरद पवारांच्या भेटीला, घरवापसीच्या चर्चांना उधाण, पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार?
Argument between two NCP in Parli broke out Sarpanch killed in firing
परळीत दोन राष्ट्रवादीतील वाद विकोपाला, गोळीबारात सरपंचाचा बळी; शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
sant tukaram maharaj abhang in fm ajit pawar s budget speech
‘उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले.. अर्थमंत्री अजित पवार यांच्या भाषणात संत तुकाराम महाराज यांचे अभंग

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील ठाकुर्लीत पारंपारिक पध्दतीने दिवाळी साजरी; आकर्षक पध्दतीने बैलांची सजावट

फटाके कधी लावायचे, सण कसे साजरे करायचे हे न्यायालय ठरविते. परंतु आदेशाचे पालन होते का याकडे न्यायालयाकडून लक्ष दिले जात नाही. मराठी पाट्यांच्या विरोधात येथील व्यापारी न्यायालयात जातात.  सर्वोच्च न्यायालयाने मराठी भाषेत पाट्या असाव्यात असा आदेश दिल्यानंतरही सरकारकडून त्यासंदर्भाची अमलबजावणी  होत नाही. त्यामुळे आता आम्हालाच आता काहीतर करावे लागेल असेही ते म्हणाले.  राम मंदिर दर्शानाचे नागरिकांना अमीष दाखविण्याऐवजी तुम्ही काय कामे केली ती जनतेसमोर दाखवा, अशी टिका त्यांनी अमित शाह यांच्यावर केली. वाजपेयी यांच्या काळातील भाजप वेगळी होती. आताची भाजपची खूप वेगळी आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही. धाडी जास्त काळ टिकणाऱ्या नसतात. त्या उलटून अंगावर येऊ शकतात, अशी टिका त्यांनी भाजपवर केली.

राष्ट्रवादीची स्थापना १९९९ मध्ये झाली. त्यानंतर जातीयवाद सुरू झाला. त्यामुळे महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश होण्यास वेळ लागणार नाही. यांच्या स्वार्थी राजकारणामुळे आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालत आहोत. महाराष्ट्र सर्वच बाबतीत अग्रेसर होता. आता महाराष्ट्राची प्रतिमा वाईट करण्याचे काम सुरू होत आहे.