कल्याण / ठाणे : देशाच्या मुख्य नागरी समस्यांकडे राज्यकर्त्यांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या कष्ट, मेहनतीकडे दुर्लक्ष झाले आहे. संसदीय लोकशाहीला प्राधान्य न देता नरेंद्र मोंदीच्या नेतृत्वाखाली देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी कल्याण येथील प्रचार सभेत केली.

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारासाठी पवार यांच्या कल्याण आणि शहापुरात सभा झाल्या. ऐतिहासिक घटनांचे दाखले देत त्यांनी कल्याणचे महत्व अधोरेखित केले. ‘चीनने देशाच्या सीमेवरील महत्वाचा भाग गिळंकृत केला आहे. त्याकडे मोदींचे दुर्लक्ष आहे. त्यांचे लक्ष फक्त निवडणुकीकडे आहे. यापूर्वीच्या निवडणुका लोकांच्या समस्या, त्या मार्गी लावणे या विषयावर घेतल्या जात होत्या. पण आता व्यक्तिगत टीका, टिंगल टवाळी यापलिकडे काहीही केले जात नाही,’ असा आरोप पवार यांनी यावेळी केला. संसदीय लोकशाही टिकवण्याचे महत्वाचे काम आता लोकांना करावे लागणार असल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी, शहापूर येथील वाशिंदमध्ये झालेल्या सभेत पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या विचारांच्या घटकांचा १०० टक्के पराभव करणे आवश्यक आहे. असे झाल्यास ही निवडणूक देशाला योग्य रस्ता दाखविणारी ठरेल, असे आवाहन केले.

supreme court on governor marathi news
चतुःसूत्र: राज्यपाल न्यायिक पुनरावलोकनाच्या कक्षेत
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
cbi investigation into financial irregularities in r g kar medical college
आर्थिक अनियमिततेप्रकरणी ‘सीबीआय’चा तपास; कोलकाता हत्या प्रकरणात आरोपींच्या मालमत्तांचीही झडती
PM Modi participate in Lakhpati Didi Sammelan at Jalgaon
मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही
Opposition of Mahavikas Aghadi to development works in Naina area
नैना क्षेत्रातील विकसकामांना महाविकास आघाडीचा विरोध
Maratha Reservation, reservation,
आंदोलनांना बळी पडून आरक्षण दिले, तर राज्यातही बांगलादेशसारखी परिस्थिती, आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा दावा
Himanta Biswa Sarma Assam BJP divide to fore Ashok Sarma
‘अडचण हेमंत बिस्वा शर्मा यांची आहे!’ आसाम भाजपामध्ये दुफळी; ‘जुने विरुद्ध नवे’ वाद चव्हाट्यावर
Ajit Pawar gets emotional at the Women Gathering The Security Shield of Sisters Around Me
‘माझ्याभोवती बहिणींच्या राख्यांचे सुरक्षा कवच’; महिला मेळाव्यात अजित पवार भावनिक

गांधी कुटुंबीयांनी देशासाठी त्याग केला. पण आता त्यांनीच देशासाठी काय केले असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशी घातक प्रवृत्ती रोखण्याची ही वेळ आहे. – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)