कल्याण-भिवंडी मार्गावरील टेमघर भागात रिक्षा अपघातात दीड वर्षांच्या समीर गौतम याचा मृत्यू झाल्याचा प्रकार गुरूवारी उघडकीस आला आहे. समीरला ताप आल्याने त्याची आई आणि आजी त्याला रिक्षातून दवाखान्यात घेऊन जात होते. या अपघाताप्रकरणी समीर याचे वडील अश्विनकुमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> मानखुर्द-ठाणे प्रवास लवकरच वेगवान, छेडानगरमधील उड्डाणपुलाचे काम पूर्ण

akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश

टेमघर भागात अश्विनकुमार राहत असून त्यांना दीड वर्षांचा समीर हा मुलगा होता. समीरला ताप असल्याने समीरची आई आणि आजी त्याला रिक्षामधून डॅाक्टरकडे घेऊन जात होते. दरम्यान, रिक्षा अरिहंत टाॅवर परिसरात आली असता, रिक्षा चालकाने भरधाव रिक्षा चालविली. त्यामुळे त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा समोरील एका रिक्षाला घडकली. या घटनेत समीर, त्याची आई आणि आजी रिक्षातून खाली पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु समीरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शुक्रवारी समीरच्या वडिलांनी रिक्षा चालकाविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.